Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रीसमर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर तो क्रोधायमान होत असे. कुठे आमचे …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

अखंड नाम! महान चैतन्य शक्ती…©️

अखंड नाम! महान चैतन्य शक्ती…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम! महान चैतन्य शक्ती, चितशक्ती म्हणजेच अखंड नाम!

या नामाच्या जोरावर अघोरांचा नाश केला. अनंतांचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ,

भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तीचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत. सद्गुरूंना बनविणे उपयोगाचे नाही. या सर्वस्वांची नोंद होते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही. ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत, तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल?

सद्गुरूंना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरूंनी त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात, अरे या मानवी सेवेकऱ्याने किती जन्म घेतले आहेत अन आता जर तो पुन्हा अनाठायी गेला तर कुठे व कसा भटकेल हे सांगता येत नाही. ही चिंता सद्गुरूंना असते. किती श्रेष्ठत्व आहे लक्षात घ्या. ते क्षणिक पहात नाहीत…©️

You cannot copy content of this page