Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

सागरासारखे विशाल व्हा ! ©️

सागरासारखे विशाल व्हा ! ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकऱी प्रवचन ऐकतात, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालतात का? आदेश मानतात का? मनात रुजू करून घेतात का? सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. तुम्हाला सांगून ते करून घेईल का? तर नाही. सेवेकऱ्यांच्या मनात शंका कुशंका का येतात?

या दरबारात काय चालते हे मी पूर्णत्वाने जाणतो. सेवेकर्‍यांची मने शुद्ध किती आहेत हे पण जाणतो. यात सद्गुरूंचा दोष नाही. सेवेकरी आपल्या कृतीचे फळ आपल्या ओटीत घेतो. सेवेकरी फसतो तो कशामुळे फसतो? काय कारणाने वाहत जातो? तर मनात शंका आणतो म्हणून फसला जातो, त्यात सताचा काय दोष आहे?

अनेक वेळेला सांगितले, मला आदी अंत काहीही नाही. ॐ कारांचा कोणी अंत घेतला आहे का? जे अखंड तत्व बहाल केले आहे, त्यात किती सेवेकरी रममाण झाले आहेत? एक एक तप झाले तरी शंका रहित होत नाहीत. शंकेला डावलू शकत नाहीत, मग हा सेवेकरी कसला? असत कृतीचा खजाना सेवेकरी वाढवू लागला, तर माझा त्यात काही दोष आहे कां?

आसनाधिस्त काही गोष्टी बाहेर कुणाला सांगू नका म्हणून सांगत असतात, त्या तुम्ही उघड करता. ज्यांनी मस्तकी हस्त ठेवला, त्यांचा शब्द तुम्ही मानला आहे का? त्यांचा शब्द तुम्ही अव्हेरता.

एका तत्त्वाचे सेवेकरी, एका सद्गुरूची लेकरे असताना सेवेकऱ्यांची मने अजून गढूळ का आहेत? केव्हा शुद्ध होतील? बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का? विशाल ! ©️

You cannot copy content of this page