Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

तुका झाला सांडा, विटंबती पोरे रांडा ! ©️

श्री समर्थ मालिक - संतांच्या म्हणीप्रमाणे भक्ती कशी आहे?      तुका झाला सांडा ! विटंबती पोरे रांडा !! मग भक्तिसाठी कसे झाले पाहिजे? भक्त हा समर्थांसाठी, भक्तिसाठी, सांडा होतो. भक्त सांडा झाल्यानंतर, भगवंत सुद्धा त्याप्रमाणे होतात. भक्तिची विटंबना झाली तर ती भगवंताची विटंबना होते. भक्त सांडा झाल्यानंतर कोणी काही म्हणो, त्याची चाड भक्ताला पण…

Read More

सेवेकरी चकतो का? – २ ©️

येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषयी निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते. सत् सानिध्यात फार नितांत श्रद्धा असावी लागते, नाही पेक्षा जसे सेवेकरी तसे मला वागावे लागते. सेवेकरी नितांत, मी पण नितांत. सेवेकरी आत बाहेर, मग मलापण नाईलाजाने तसे वागावे लागते. अहर्निश प्रापंचिक बाबी करता, काबाड कष्ट करता, एरवी ज्योती…

Read More

सेवेकरी चकतो का? ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी चकतो का? कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते त्याच्यावर सेवेकऱ्याने बाहेर वाच्यता न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो. खरोखरच येथील सेवेकऱ्यां जवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी…

Read More

…एक भक्त, एक कां वैरी – श्री समर्थ मालिक ©️

मी असतो सर्वांचे शरीरी ! तरी एक भक्त, एक का वैरी !! दीपकाचे अंगी नाही दूजा-भाव ! चोर आणि साव सारखेची !! चोर असो अगर साव असो, प्रकाश सर्वांना सारखाच मिळतो. तद्वतच आपल्या दरबारच्या शिकवणीचा मार्ग आहे. हा राजमार्ग आहे. या मार्गाने गेल्यानंतर चोर असो वा साव असो, त्याच्याशी आपला संबंध नाही. या ठिकाणी सुद्धा…

Read More

नामस्मरण कसे करावे – अलख – भाग तीन ©️

सेवेकरी म्हणतील, येथून उतरल्यावर आसन रिकामे असते, तर आसन कधीही रिकामे नसते. मालिक येथेच बसलेले असतात. स्थूलांगी तिकडे जातात. आपण काहीही केले, तरी त्यांच्या नजरेतून सुक्ष्माहूनही सुक्ष्म सुटत नाही. तुम्हीं प्रथम आपल्या गुरूंचे दर्शन मिळविले तरच पुढे मार्ग मिळेल. गुरू दर्शन सोपे नाही. गुरू दर्शन हाच शेवट…

Read More

नामस्मरण कसे करावे – अलख – भाग २ ©️

आपल्या दरबारची चार तत्वे आहेत. त्यांचे पालन करा. जो बोल काढला, त्या बोलाला महत्व आहे, तो सत् करा. जी कृती हाती घेतली, ती पूरी करा. ते न करता, सेवेकरी दुसरेच करतो. जे गुरू, ज्यांचा शिरी हस्त पडला, त्यांनी मार्ग दाखविला, त्यांची ओळख ठेवणे, त्यांना पाहणे कठीण तितकेच सोपे देखील आहे. पण कसे? त्या मार्गाने…

Read More

नामस्मरण कसे करावे – अलख ©️

नामस्मरणात बसल्यानंतर, अखण्ड नाम चालू असताना मन मायावी जाळ्यात गुंतवले त्याला अर्थ नाही. असे नामस्मरण मालकांच्या चरणांवर रूजू होईल काय? तासन् तास बसण्यापेक्षा पाचच मिनिटे बसा. सर्वस्व विसरा. मालिक आणि मी, बाकी काही नाही. अशा तऱ्हेने बसलात तर होईल. तासन् तास बसून, दुनियेच्या वदघटित मन गुंतवणे, विचार करणे, त्या नामाचा उपयोग नाही. तसे न करता,…

Read More

श्री समर्थ एकचित्त – भाग दोन ©️

दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे. स्थुलाचे विवेचनावर पुढे निवेदन होईल. सेवेकर्‍यांचे सर्वस्व कोडकौतुक पुरविण्यात येईल. चारही देहावर विवेचन करण्याची वेळ आली तर जरूर विवेचन करण्यात येईल. जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष…

Read More

श्री समर्थ एकचित्त – भाग एक ©️

सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे मागे पुढे होते. त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते. कोणतीही घडण घडविण्यासाठी काहीतरी निमित्त काढावे लागते.  एवढेच,…

Read More

बोध – भाग तीन ©️

भक्तिला प्रथम प्रेम पाहिजे. भाव पाहिजे. पण तो कसा पाहिजे? तर शुद्ध स्फटिकासारखा पाहिजे. प्रेम पाहिजे. रसना ओलावल्या मग त्याच अमृतमय होतात. पण त्याला प्रकृती कशी हवी? हे कशाने होईल? कसे होऊ शकते? रसना ओलावण्याकरिता काय पाहिजे? याला स्वतःचा पाया, घर मजबूत पाहिजे. प्रकृती शुद्ध पाहिजे. प्रकृती शुद्ध झाल्यानंतर मग वेळ आहे का? भूमी शुद्ध…

Read More

बोध – भाग दोन ©️

जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लीन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो, करतात ते मालिक करतात. मी निमित्त आहे. असे जेव्हा सेवेकरी म्हणेल, मग मात्र त्याला बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात (नामस्मरणात) जागृत राहणे, त्याचा उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो. प्रकृती जोपर्यंत अभिन्न…

Read More

बोध – श्री समर्थ मालिक ©️

अखंड सत् तत्वाची गती ज्यानी मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्‍हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा करणे, म्हणजे…

Read More

You cannot copy content of this page