Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

सदगुरू दूर नाहीत….©️

सेवेकऱ्याचे भोगत्व जोपर्यंत शिल्लक आहे, तोपर्यंत त्याला ते भोगत्व भोगू दिले जाते. माझ्या हातून काही चुक झाली नाही, असे म्हणणारा सेवेकरी किती महान असला पाहिजे? साधी चुक कबुल करण्यास केवढा अट्टाहास. सेवेकरी आपल्या कर्तव्यात आड मार्गानें जातात आणि भोगत्व भोगतात. चुकीचे क्षमत्व आणि चुक, सेवेकऱ्याच्या मुखातून कबुल झाली पाहिजे. त्याशिवाय सदगुरु क्षमत्व नाही.…

Read More

सत् सेवा – भाग तीन ©️

त्याने (एकलव्याने) प्रतिमा जागृत केली. त्याच्यात अफाट गुरुभक्ति निर्माण झाली आणि तो एक आदर्श सेवेकरी झाला. त्याप्रमाणे व्हावयास पाहिजे. त्याने अहोरात्र काबाडकष्ट करून, विद्या संपादन केली. त्याने सद्गुरू मुखातून अमोल बोल आल्यामुळे हे केले. सत सेवेसाठी सत् सेवेकरी आपल्या प्राणाचीही पर्वा करीत नाही. अंगठा घेऊन काय करावयाचे होते? पण द्रोणाचार्यांना सत् किती आहे, हे पहावयाचे…

Read More

सत् सेवा – भाग दोन ©️

सेवा आणि सेवेकरी म्हणजे काय? ती कशी करावयाची? सेवेकरी आपल्या सद्गुरूंना देऊन देऊन काय देणार आहे? सद्गुरुनी काय अपेक्षा केली तेव्हा गुरुतत्त्व हे असे आहे त्याचा अंत:पार नाही. त्यांच्या मुखातला एक कण जरी झेलला, तरी तो सेवेकरी भाग्यवान आहे. एकच, गुरुतत्त्व आणि सेवेकरी यांचे महत्त्व पुराण काळापासून या भारतात आहे. त्याचे एक उदाहरण देत आहे.…

Read More

सत् सेवा ©️

सत शुद्ध अंत:करणाने प्रेरित होऊन सद्गुरु चरणांवर बहाल केलेली सेवा थोडी का असेना ही पूर्णत्वाने रुजू आहे. हे करताना सेवेकरी, आतून आणि बाहेरून हेलावून गेला पाहिजे. करायचे म्हणून करायचे, हे ओझे म्हणून ठेवले आहे, म्हणून करायचे, तर हे केलेले चरणांवर रुजू होत नाही. पण, अंतःकरणापासून आपण केले, तर ते प्रेमभराने रुजू करावे लागते. सद्गुरूपद हे…

Read More

पडीले वळण … भाग दोन ! ©️

अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला मिळतात. तो सतापर्यंत येऊ शकत नाही. कारण इंद्रियाना वळण सत् पाहिजे. मग वागणूक कशी ठेवली पाहिजे? सत् भक्ताचे कर्तव्य कोणते आहे? घाबरू नका, उत्तर द्या. खेळीमेळीचे वातावरण आहे, तेव्हा निष्कारण वेळ घालविण्यापेक्षा अखंड तिजोरीत रममाण झाला, मग प्रकाश लांब आहे का? मग तुमची इंद्रिये इकडे तिकडे का बोकाळतात?…

Read More

पडीले वळण इंद्रिया सकळा ! ©️

श्री समर्थ मालिक–पडीले वळण इंद्रिया सकळा ! भाव तो निराळा नाही दूजा !! इंद्रियाना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या रितीचे नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्याच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत…

Read More

चार दरबार ! ©️

अलख – चार दिशांना चार दरबार ! या चार दरबारांपैकी हा एक दरबार आहे. याच दरबारात (सताचे) प्रत्यक्ष येणे असते. येथेच अमौलिक बोल आपणाला ऐकावयास मिळतात. ते बोल जतन करून ठेवा. दरबारातून गेल्यानंतर, ते बोल विसरू नका. त्यांची आठवण ठेवा. स्वतःमध्ये असणारा अहंपणा, मी-तू पणा नाहीसा करा. सर्वजण बहीण - भावंडाप्रमाणे वागा ! शेजाऱ्यासारखा दूजा…

Read More

सत् भक्तिचा मार्ग ©️

कुंभ मुनी - सत तत्वात रममाण होण्यासाठी, सत् भक्तिच्या मार्गाने जाणाऱ्या ज्योती क्वचितच असतात. समर्थांना श्रद्धायुक्त ज्योती पाहिजेत. श्रद्धा डळमळीत असली तर या मार्गात तो टिकू शकणार नाही. काहीही होवो, श्रद्धा डळमळू देता कामाची नाही. हे स्वयमेव तत्व आहे.‌ याचा वास अंत:र्यामी आहे. ३३ कोटी दैवते आपल्यातच आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आपल्यातच आहेत. ३६ कोटी…

Read More

आधी बीज एकले – भाग दोन ©️

एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे, याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे त्याची खूणगाठ बांधावी, तरच बीज दाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती तर या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव…

Read More

आधी बीज एकले…..©️

श्री समर्थ मालिक – "आधी बीज एकले | बीज अंकुरले | रोप वाढले ||""एका बीजापोटी, तरु कोटी कोटी | जन्म घेती सुमनें-फलें ||""व्यापुनि जगता तूंहि अनंता | बहुविध रूपें घेसी, घेसी परि अंती ब्रह्म एकले |" आधी बीज, त्यानंतर फळ. फळात परत बीज निर्मिती. त्याचा मानव उपभोग घेतो. मूळात बीज कोठून निर्माण झाले? बीजाची पैदास…

Read More

मुक्त होता परी बळें – भाग (२) ©️

जन्माला फेकल्यानंतर तो भक्त कसा असतो? कर्माच्या शाखा दोन – सत् आणि असत ! मग असत मार्गाने गेल्यानंतर तो पूर्ण बद्ध झाला. मग तो जन्माला आला काय आणि नाही काय सारखाच ! समर्थ आपल्या ऋणातून मुक्त होतात. त्याला, मानव जन्म देतात. मग पुढे तो मायेच्या आधीन बनून असत मार्गाने जातो. मग, करतो ते मीच करतो…

Read More

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । ©️

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥ तुका म्हणे गेलें व्यर्थ वायां विण । जैसा मृगसीण मृगजळीं ॥३॥ एखाद्या महान भक्ताला किंवा सेवेकऱ्याला, अह:र्निश सद्गुरु ध्यानात, नामात तल्लीन असता, रात्रंदिवस कष्ट केलेले असता, थोडक्यात शेवट शेवट, मुक्ति मोक्ष…

Read More

You cannot copy content of this page