रुप, रस, गंध, बोल किंवा शब्द व स्पर्श हे जरी वेगवेगळे विषय असले, तरी ते विषय न राहता विकार ह्या अर्थी भक्तिमार्गात वापरले जातात.
आपणांस कल्पना आहेच की विकार म्हटले कि मानव हा त्यात भरडला जातो, भरकटला जातो. विकार किंवा विषय हे एखाद्या रोगासारखे असतात. त्यांचा परिणाम मानवांवर झाला की मानवाचे कोटकल्याण न होता, तो…
“विषय तो माझा झाला नारायण”
विषय हे पाच आहेत – बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध ! बोल या विषयामध्ये हरण हा मृत्यू पावला आहे. स्पर्श या विषयामध्ये हत्ती मृत्यू पावला आहे. रूप या विषयांमध्ये पतंग मृत्यू पावला आहे. रस या विषयांमध्ये मासा मृत्यू पावला आहे आणि गंध या विषयांमध्ये भ्रमर मृत्यू पावला आहे.…
हे धन कधीही उच्च पातळीला भिडविणारे नाही. म्हणून धनलोभी होऊ नका. धन पाहिजे, पण फक्त व्यवहारासाठी. धनासाठी सेवेकरी लांड्यालबाड्या करतात, पण ते योग्य नव्हे.
धनाचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास, समर्थ कमी पडू देणार नाहीत. समर्थ सांगतात, ते दूरवर विचार करून सांगतात. अशा तऱ्हेने जो वागेल, त्याला समर्थ काहीही कमी पडू देणार नाहीत.
जडाला, स्थुलाला…
कालचेच उदाहरण घ्या, “एका दरबारात दिलेले प्रणव, दुसऱ्या दरबारात फिरवितो.” हे दोघांचे चाललेले होते. दोघेही सताचे सेवेकरी. एका कपात चहा पिणारे. पण दोघेही एकमेकांच्या डोक्यावर ठेवतात. यांना शांती कुठून द्यावयाची? पण धनासाठी लबाडी करणारे, यांना कधी शांती मिळेल कां?
आपण शांततेने झोप घेता, पण धनवानाला शांत तऱ्हेने झोप येत नाही. ती अघोर माणसे समजा.…
कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच ! कोळसा जर तेजाळत नाही तर त्याला किती उगाळणार?
तेव्हा दृश्य तेजाळले पाहिजे. कोणत्याही चाकोरीत फेकले तर विचार उच्च कोटीचे पाहिजेत. उच्च पातळीचे विचार नसतील तर दृश्याची काहीच किंमत नाही. गल्लीबोळात फिरणाऱ्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था असते.
समर्थांनी सांगितले आहे की, "त्रिभुवनात किती फुले फुलतात, पण ठराविकच माझ्या…
आपणच आपल्या कृतीप्रमाणे देव व दानव बनतो. दानव काही निराळे नाहीत. दानव म्हणजे अहंकारयुक्त, आचार विचार नाही अशी बुद्धीहीन ज्योत होय.
स्थुलाचे बुद्धी हे भांडवल आहे, पण ती बुद्धी तेजाळलेली पाहिजे, धुरकटलेली, बुरसटलेली नको. तिला सत् शुद्ध विचारांची पावडर मारली पाहिजे. सत् शुद्ध विचारांचे घर्षण झाले तर ती तेजाळलेली राहील.
सगळ्यांचा मदमेरू मन आहे.…
आपण जे पाहतो, ओळखतो, देवाण-घेवाण करतो, मायेने व्यवहार होतो. ही सर्व दृश्य दृश्यांची गती आहे. दृश्याला याची आवश्यकता आहे. जो आत वास करतो कि ज्याच्यामुळे आपण युक्ती लढवतो, पैसा मिळवतो, त्याला विसरुन हे धन माझे आहे असे म्हणतो. चांगल्या तऱ्हेने अगर वाईट मार्गाने सुद्धा धन मिळवितो, पण त्याला पूर्णत्वाने जाणीव असते की मी कोणत्या तऱ्हेने…
हे सर्वस्व तुमच्या कृतीच्या आधीन आहे. पण याच्या उलट, दृश्य धन लाभल्यावर त्याला इतरांची किंमत वाटत नाही. ओळख रहात नाही. त्यात तो एवढा गुरफटतो कि, त्याला वाटते हेच सर्वस्व परब्रम्ह आहे. यातच सर्वस्व स्थावर जंगम संपत्ती आली. या व्यक्त धनासाठी कोर्ट कचेऱ्या, भानगडी वाढतात. भांडणे होतात. एवढे जरी झाले, तरी व्यक्त धन त्याच्याबरोबर जाते कां? …
बाबा - सत् कर्तव्यापासून दूर कोण नेत असेल तर ते एकच, धन ! धन जर मानवाजवळ असले, तर त्याला मान मरातब मिळतो. त्याची प्रसिद्धी होते. त्याला सर्वस्व चाहतात. सर्व लोक मान देतात. रामदास स्वामींनी म्हटलेले आहे, “मरावे परि किर्ती रुपे उरावे !” त्यांनी किर्ती मिळवली. ते आपल्यामध्ये अजून ताजे आहेत. त्यांनी जी किर्ती मिळविली, नाव…
रामदास, ज्ञानदेव यांचे उदाहरण घ्या. ते कसे नि:ष्काम होते. त्यांची भावना नि:ष्काम होती. पार्थाला सुद्धा भगवंताने सांगितले, “तुझा हा सर्वस्व भ्रम आहे. तुला फक्त निमित्ताला उभे केले आहे. तू फक्त निमित्तासी कारण आहेस, मारविता मीच जाण, ते कसे ते बघ.” लाघवी रूप धारण केले. दृश्य रूप प्रगट केले. पण, त्याला पाहता येईना. त्यांनी त्याला…
आपण सर्वस्व दृश्य आहोत. जडत्व आहोत. दृश्य हे सर्व जग आहे. चर अचर सुद्धा दृश्य आहे. ज्याला हालचाल नाही ते निर्जीव आणि ज्याला हालचाल आहे, ते सजीव. हे सुद्धा दृश्य आहे. आपल्या गेल्या जन्मीचे जे प्रारब्ध त्याप्रमाणे या योनीत सत फळ मिळत असते आणि ते समर्थ देतात. समर्थ म्हणतात, “मी कोणाचाही ऋणी नाही. ज्याच्या त्याच्या…
आज जे काही सांगत आहे, त्यावर मन:पूर्वक विचार करा. आपणालाच आपली उत्तरे मिळतील. सत् मार्ग कसा आहे, त्याची जाणीव मिळेल.
आपले गुरू कोण? ज्यांच्यापासून अखंड ध्वनी, अनुग्रह मिळाला, तेच आपले गुरु होय. प्रथम गुरूंचे दर्शन, नंतर पुढील सर्व ! …