श्री विठ्ठल - उत्तम धर्म कोणता? तर मानव धर्म! मानव म्हणजे पूर्ण ओंकार स्वरूप आहे. पण काही मानवांना घेता येत नाही. या मानव जन्मात लांड्या लबाड्या करणे, आदेश मोडणे, आदेश धुडकावणे, याची शिक्षा म्हणून हे सत् तत्व काय करील याचा अंत मला सुद्धा नाही. पण इतके सांगायचे की, एकाचा अंत घ्या, मग शून्याचा ठाव मिळेल.…
श्री विठ्ठल - एकादशी या शब्दाचा अर्थ फार गहन आहे. खोल आहे. या मायावी मानवांनी याचा अर्थ केलेला नाही, घेतलेलाही नाही. उपास करून एकाचा अंत मिळत नाही. एक म्हणजे व्यक्ती म्हणजे आकार आला. एकातच रममाण झाल्यानंतर शून्याचा ठाव सापडू शकतो. एकाला धरूनच शून्याचा ठाव लागतो. एकाला धरले नाही तर शून्याचा ठाव सापडणे कठीण आहे. जो…
काही संतांनी म्हटले आहे, “झणी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा | जेणे माझ्या मना बोध केला |” मग त्यांनी ध्यान दृष्टी कशावर लावली होती? तर सगुणावर ! सगुणापासून त्यांना शांती मिळाली म्हणजे व्यक्ती पासून, जडत्वापासून जडत्वाला शांती मिळते. मग ज्या सगुणापासून सगुणाला शांती मिळते, ते सगुण कोणते असेल? म्हणून त्यांच्याजवळ काहीतरी अधिकार आहेत म्हणून हे शांती…
श्री संत तुकाराम - सताने म्हटले आहे की ही दृष्टी सगुण रूपात निमग्न होऊ दे. त्यातच सर्व काही होईल. सगुणा पासून दृष्टी लांब घालवू नको. म्हणूनच म्हटले आहे, सगुणाचा सार येणे नाम संसार ! म्हणजे सगुण पाहता पाहता भक्त निर्गुणाप्रत आपोआप जातो.
जो माझे माझे म्हणतो, हे मी केले, ते मी केले म्हणतो, तो…
एखादा महान भक्त किंवा सेवेकरी अह:र्निश सद्गुरु ध्यानात नामात तल्लीन असतात, रात्रंदिवस कष्ट केलेले असतात. थोडक्यात, शेवट शेवट मुक्ती मोक्ष मिळण्याचा संभव असतो. अशी वेळ जवळ आली असताना, त्याला कशी आशा सुटते? तो कोणत्या रस्त्याने जातो? तर त्याला मायेची आशा लागते. थोडासा सताचा विसर पडल्यानंतर हे माझे, ही माझी जमीन, माझा पैसा सर्व माझे माझे…
श्री समर्थ मालिक - जो नारायणाच्या ध्यानात तल्लीन झाला त्याला सुखदुःखाचे वर्णन करता येणार नाही. त्याला त्याची वाक्यरचना करता येणार नाही. सुखदुःख कशाला म्हटले आहे? आत्ता तुम्ही या ठिकाणी आलात मग दिवसभर काय करता? कोणाला सुख आहे? ज्याच्या घरी कोट्यांनी संपत्ती आहे तो तरी सुखी आहे का? जो रात्रंदिवस दोन मिनिटे म्हणा, दोन सेकंद म्हणा…
श्री समर्थ मालिक - आता आत्मरूपाची गती कोणाला माहित नाही? मग दोष कोणामुळे होतो? माझ्यापासून होतो का? ही प्रकृती जीवनाच्या मुशीत आल्यानंतर हजारो गुन्हे होतात. ते त्याच्या संचितात रुजू होतात. ते भोगत्व त्याला भोगल्याशिवाय सुटत नाही. मग पुढे दोष लावायचा कुणाला? तर नारायणाला. पण नारायण तसा ऐकणार आहे का? नारायणाचा दोषच नाही. स्वतःची चूक…
चैतन्य ! सर्व ठिकाणी भरून उरलेले, परात आहे त्याच्याही पलीकडे आहे. चरातही आहे आणि परातही आहे. सर्व ठिकाणी आहे. पाहणाऱ्याला पाहता येते, न पाहणाऱ्याला सापडत नाही. अशी ही चैतन्यमय स्थिती सेवेकरी अनुभवतात. इतर मानवांना त्याचा अनुभव नाही. अनुभवाशिवाय गोडी लागेल का? हेच जडत्व, ध्यानात लागल्यानंतर विसरले जाते. त्याला कशाचीही शुद्ध राहत नाही. चैतन्य ! सर्व…
तर निर्विकारापासून निर्मिती ! प्रथम चैतन्य निर्विकार, तेथून धुनधुनकार, येथून ओंकार म्हणजेच आकार निर्माण झाला. आकार निर्माण करावा लागला. आकार निर्माण केला कोणी? आकार हेच ओंकार ! पण तो आकार ओंकार स्वरूपी बनला तर ! ॐकार स्वरूपी बनल्यानंतर त्याच्यापासून सृष्टीची रचना झाली. ॐ कारा पासून माया म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुण निर्माण झाले. तदनंतर…
श्री समर्थ मालिक - मी कसा आहे? अंगुष्ठमात्र आहे. अंगुष्ठमात्र म्हटले आहे. जसे म्हणाल तसा आहे. तर कसा आहे? चिन्मय आहे. चैतन्यमय आहे. चैतन्यमय स्थिती नसेल तर सेवेकरी काही करू शकेल का? या चिन्मय स्थितीवर कोणाचा भरवसा आहे, तर कोणाचा नाही. मग मी कसा आहे? मला आदी नाही, मध्य नाही आणि अंत पण नाही. रंग…
संतांनी स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तित रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाही. पापपुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. ते संत, रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. पण प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का? अघोर मानव अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला…
इंद्रियांना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रियें सद्गुरुमय झालेली होती. त्याचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले…