Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

श्रीराम नवमी संदेश (२) ©️

या कोकणातील आसनाच्या कर्तव्याच्या बाबतीत आसनाधिस्त नाराज आहेत. पण त्यांना सांगणे आहे की, आपण बिलकुल नाराजी पत्करू नये. कर्तव्य करणारे, करून घेणारे फार निराळे आहेत. आपण फक्त देखभाल करीत राहणे. मी प्रत्यक्ष राम अवतारात असताना असेच केले आहे. मला ज्या ठिकाणी अडचणी आल्या, अडचणी निर्माण झाल्या त्या मी माझ्या सद्गुरूंना निवेदन केल्या. अन् त्यांच्या संदेशप्रमाणे…

Read More

श्रीराम नवमी संदेश ©️

वेळोवेळी सतपद या ठिकाणी संदेश देत आलेले आहेत व देतही आहेत. या पदाच्या आसनाचे कर्तव्य प्रगतिशील, उज्वल अन् भरभराटीचे आहे. आतापर्यंत ते अव्याहत, अवर्णनीय असे चाललेले आहे. पुढेही परम गतीने होणार आहे. माझ्या अवतार कार्याच्या वेळेस अघोरांचा स्थूलांगी नि:पात केला. त्याचेच शेष राहिलेले हे कार्य सतपदाचे आसन करीत आहे. अघोरांना या शिवाय दुसरी कोणतीही…

Read More

सुख आणि दुःख ©️

मानवाने सुख आणि दुःख हे दोन विभाग केलेले आहेत. पण सुख कशाला आणि दुःख कशाला म्हटले आहे? कोट्याधीश हा सुखी आहे का? मग सुखी कोणाला म्हटले आहे? कोट्याधीश सुद्धा सुखी नाही. संपत्ती रेलचेल असली तरी तो दु:खी असतो. आणखी आणखी हे सारखे त्याच्या डोक्यात भरलेले असते. दुःखाची व्याख्या म्हणजे सदोदीत त्रास, काबाडकष्ट ही…

Read More

…ओळखणारा पाहिजे ! ©️

मग त्याच्या अंत:र्यामी कोण आहे? मारतो कोण? मग त्याचा मार मला लागतो का? मी अभेद्य आहे. अभिन्न आहे. मला कोणी धरू शकत नाही. मला कोणी पकडू शकत नाही. मला जसा पाहाल, तसा मी आहे. अन् म्हणून सेवेकऱ्यांनी आपल्याला जे घ्यावयाचे, ते घ्यावे. वाईट सोडून द्यावे. सत चरणांचा अंत घ्या. चरण सापडले की पुढे वाटचाल…

Read More

…ओळखणारा पाहिजे ! ©️

श्री समर्थ मालिक – ‌ मी नाही आकाशी, मी नाही पाताळी ! इतकेच की भक्त त्या पात्रतेचा असेल तर ! निष्काम, परिपूर्ण, सत स्फटिकासारखी वर्तणूक असेल तर मी त्या भक्ताला दूर नाही. आकाशीपण नाही आणि पाताळीपण नाही, तर मला सानिध्यात पाहता येईल, असे काही भक्तांनी सुद्धा सांगितले आहे. मी कोठे नाही असे ठिकाण नाही. इतकेच…

Read More

मी जरी ब्रह्म असलो, ©️

आज आपल्या आदेशा प्रमाणे मी जरी ब्रह्म असलो, तरी मी ज्यांना शरण आहे तेच परब्रम्ह सर्व व्यापक असून अलिप्त पण आहे. आम्ही ॐकार स्वरूप जे बनलो, ते त्या परब्रम्हाच्या, सताच्या कृपेनेच बनलो. आमच्या असंख्य चुका झाल्या, त्या सुधारण्याच्या मार्गाला आम्ही लागलो, ते सुद्धा त्या सताच्याच कृपेने !आम्ही करणारे कोण? त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानव आहेत. ते…

Read More

मी त्रिगुनातीत असणारे तत्व…©️

श्री स्वयंभू – मी त्रिगुनातीत असणारे एक तत्व आहे, अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी, त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे. त्रिगुण तत्वे त्यांनीच निर्माण केलेली…

Read More

नामापरते अन्य साधन नाही…©️

श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुन:र्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो, पण कोणाच्या प्रेरणेने, याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर…

Read More

नामाचा उजाळा केल्यानंतर…©️

श्री समर्थ मालिक - प्रणव निर्माण कसा होतो? कोठे जातो आणि कोठे लय होतो? प्रणव जो आहे तो अखंड आहे. अखंड अखंडात विलीन होते. प्रणव आकारी पण आहे आणि निराकारी पण आहे. प्रणव जर बंद पडला तर बाकी काय चालते का? तर नाही. मी जो आहे तो नामातच आहे. क्षरातही आहे, अक्षरातही आहे. चरात पण…

Read More

त्रिवेणी संगम – प्रेम, समता, बंधुभाव ©️

या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले, नंतर सांगितले तेच तुम्ही वाचता, तेच तुम्ही कृतीत आणा. सेवेकऱ्यांजवळ अजून समतेचा पाझर नाही. अजून हेवे दावे गेलेले नाहीत. अजून एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही. मला सांगा, एकमेकांविषयी प्रेमळपणा किती आहे? सद्गुरुं बरोबरचे…

Read More

अविद्येचे मूळ…©️

श्री समर्थ मालिक – अविद्येचे मूळ पर ते उपडोनी सांडू | आशा मनीषा तृष्णा काम क्रोध कुरवंडू || ज्याने अविद्येचे मूळ उखडले,‌ आशा, मनीषा, तृष्णा, काम, क्रोध यांची कुरवंडी केली, त्यांनीच हे म्हटलेले आहे. तेव्हा ते लिखाण पाहून सेवेकरी प्रयत्न करीत आहेत का? अविद्येला, मूळ मायेला उपटून टाकण्याचा प्रयत्न होईल का? जोपर्यंत सेवेकर्‍याच्या अंत:र्यामी…

Read More

समर्थ केव्हा आपणात सामावून घेतात? ©️

तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरविली का? तो आपल्या नादातच होता. तो कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का? मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी…

Read More

You cannot copy content of this page