Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री समर्थ मालिक प्रवचन (३) ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन (३) ©️

मानव हा मायेत गुरफटलेला आहे. त्यातून सुटका कशी होईल हे समजण्यासाठीच या दरबारची निर्मिती आहे.

चार दिशेला चार दरबार आहेत. अशा तऱ्हेचा उत्सव अनेक ठिकाणी आज होत आहे. परंतु हा स्वयं दरबार आहे. या ठिकाणी एक क्षण का होईना, प्रयत्न करने हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी अखंड तत्व प्रगट आहे. ते प्रगट आहे किंवा नाही, ह्याची प्रत्येकाने पाहणी करावी आणि ज्यांनी या तत्वाची जाण घेतली तेच खरे सत् शिष्य ! तेच खरे सत् भक्त होत !

या ठिकाणच्या तत्वाची, येथील घडामोडींची जाणिव घेण्याचा प्रयत्न करा. हा स्वयं दरबार आहे. चार दरबारचे सेवेकरी या ठिकाणी सूक्ष्माने आले आहेत. ते पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड केली पाहिजे. या ठिकाणी काय चालले आहे, ह्याची एका क्षणाकरीता का होईना जाण घेणे हेच मानवाच्या मुख्य कर्तव्याचे मुख्य अंग आहे. आपण कोण ह्याची जाणीव घेणे, स्वस्वरुप दर्शन घेणे आणि त्याचबरोबर आपल्या आद्य कर्तव्याची जाणीव ठेवून सद्गुरु चरणांत रममाण होणे, त्यांच्याच स्वरूपात लय होणे. अशा तऱ्हेने पायरी पायरीने त्यांच्या ठिकाणी तेच नेऊन पोहचवितात. त्यांच्या कृपेशिवाय, त्यांच्या सानिध्याशिवाय त्यांच्या ठिकाणी कोणीही जावू शकणार नाही. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page