Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

स्वयंभू ! ©️

स्वयंभू ! ©️

बाबा, मालकांना विचारणा करतांना म्हणतात, “आमच्याही पेक्षा खरा शिव न्यारा आहे. ते कसे? आम्हाला थोडेसे सांगा ! 

समर्थ म्हणतात, “स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी आहे. स्वयंभू हे भोळे आहेत. त्यांची कोणी भक्ती केली किंवा काहीं विचारलं सवरलं म्हणजे ते झटदिशी वचन देतात. त्यांना मागचा पुढचा विचार नाही. ते नेहमी ध्यानस्थ बसलेलें असतात. त्याला मानव तप या नावाने ओळखतात. स्वयंभूच्या तपाचा कोणी भंग केला म्हणजे ते झटदिशी शाप देतात, परंतु स्वयंभूना विचार नाही. जरी त्यांचे भक्त असले तरीही ते त्यावेळी ओळखत नाहीत. लगेच तिसरा नेत्र उघडून शाप देतात. मग त्या शापाचे काय होते ते स्वयंभू ना कळत नाही.मानव त्यांना भोलेनाथ म्हणतात. स्वयंभूची भक्ती करणारे व इच्छा तृप्त करुन घेणारे, असे या जगात जवळ जवळ १७ टक्के लोक आहेत. परंतु त्यांची जाणीव त्या मानवाना नसते. 

स्वयंभु ना निर्माण करणारा कोणीतरी आहे. परंतु मानव कबुल करु शकत नाहीत. स्वयंभू झटदिशी वचन देतात. इच्छा तृप्त करतात, म्हणून त्या मानवाना वाटते की स्वयंभू हेच साक्षात ईश्वर आहेत. परंतु त्यांची जाणीव घेणारे या जगात थोडे आहेत. काही उलट तंगड्या करणारे पण थोडे आहेत. स्वयंभू आले त्या वेळी सेवेकऱ्यांनी जाणीव घेतली होती का? स्वयंभू बरोबर कोण आले होते? (आपणच) आणखी कोण आले होते? ©️

You cannot copy content of this page