या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते.
आसनाला मानवाची मानवता सिद्ध करायची आहे. तो काळ समीप आला आहे. ज्याला आपण मानव आहोत याची ओळख पटेल, तोच खरा मानव !
आपणास शुभदिनी संदेश दिलेले आहेत. फार मोठे संघर्षण होणार आहे. त्याचे सत्य उजेडात येणार आहे. त्यासाठी या आसनाचे कार्य आहे. बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आता जरी उज्वलता नसली, तरी कार्याचा फार मोठा भाग पुढे आहे. सत् हे सतच राहणार आहे ! त्याला कोणीही बाधा आणणार नाही. असत्याने काही जरी केले, तरी काहीही होणार नाही.
कोकण आसनाची परिस्थिती आता जरी अशी दिसत असली तरी पुढे काळ निराळा आहे. याच्या साठीच हे प्रयत्न आहेत. आपणाला संदेश दिले ते पार पाडावयाचे आहेत.
अघोर मानव षडरिपूच्या जाळ्यात गुरफटलेला असतो, म्हणून त्याला सताची ओळख नाही. अशांना कितीही उपदेश केला तरी तो पटणार नाही. अशांकडून आसनाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी आपण नाराज व्हावयाचे नाही. आसनाचे श्रेष्ठत्व फार उच्च तऱ्हेचे आहे. आपण पहाल ! आसनाची अवहेलना करणाऱ्या मानवांना क्षमत्व नाही. कोठून काय होईल, हे सांगता येत नाही. अघोर मानवांचे कृत्यच अघोर. त्याला बळी पडावयाचे नाही. हे संदेश आहेत. (समाप्त)©️