Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्रीराम नवमी संदेश (२) ©️

श्रीराम नवमी संदेश (२) ©️

या कोकणातील आसनाच्या कर्तव्याच्या बाबतीत आसनाधिस्त नाराज आहेत. पण त्यांना सांगणे आहे की, आपण बिलकुल नाराजी पत्करू नये. कर्तव्य करणारे, करून घेणारे फार निराळे आहेत. आपण फक्त देखभाल करीत राहणे. मी प्रत्यक्ष राम अवतारात असताना असेच केले आहे. मला ज्या ठिकाणी अडचणी आल्या, अडचणी निर्माण झाल्या त्या मी माझ्या सद्गुरूंना निवेदन केल्या. अन् त्यांच्या संदेशप्रमाणे कर्तव्य परायणता साधून सर्वस्व कर्तव्य रेटत नेले.

मुंबई आणि सातारा येथे कोणती गती झाली याची आपणाला जाणीव आहे. तद्वतच तशी तऱ्हा आता कोकणात चालली आहे. पण लक्षात ठेवा, अखेर विजय सताचाच असतो. मुंबई व सातारा या ठिकाणी विचित्र तऱ्हा निर्माण झाली होती. पण अखेर सताचाच विजय झाला. हे संदेश आपण कोकणातील सेवेकऱ्यांना देणे. पण नाराजी पत्करू नये. पुढे काय होत आहे हे प्रत्यक्ष पहा.

मी अनंत रूपे, अनंत नामाने नटलेलो आहे. माझा अंत:पार कोणालाही नाही. परंतु मी प्रत्यक्ष मृत्यू गोलार्धात जगदोध्दारासाठी जरी अवतार घेतला म्हणून सताची पिछेहाट झाली का? हेच ओळखून कर्तव्य जोमाने आणि धीराने रेटीत चला. यश अखेर तुमचेच आहे.

हल्ली महान तऱ्हेचे शुद्धीकरण चालू आहे. त्यामध्ये आसनाधिस्त नाराज होतात, पण पहा, आमच्या अवतार कार्याच्या वेळी प्रत्यक्ष स्थूलांगी समोरा समोर लढाई होत होती, पण नाराजी न पत्करता आम्ही आमचे कर्तव्य म्हणून झगडत होतो. आता तेच कार्य या ठिकाणी होत आहे. त्यावेळी स्थूलांगी मारलेले अघोरी राक्षस आता स्थूल मानवाला त्रास देत आहेत. त्याचा पूर्णत्वाने नाश करणे हे कर्तव्य आहे. आसनाधीस्त पूर्णत्वाने हे जाणीत आहेत, पण आपण मानवी तऱ्हेने नाराजी पत्करू नये. संदेशाप्रमाणे सर्वस्व कर्तव्य होत आहे. पूर्ण झाल्यानंतर, मग पहा. ©️

You cannot copy content of this page