Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

निश्चयाचे ऐसे बळ | ©️

निश्चयाचे ऐसे बळ | ©️

निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्‍याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी वेगळी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही.

प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो. महान पर्वत, काटे कुटे, जंगल, झाडी अशा मार्गातून प्रवेश करीत निघाला तरी त्याला त्याचे दुःख वाटत नाही. कारण त्याला महान गोष्ट प्राप्त करून घ्यायची असते. काही झाला तरी तो मार्ग भूलत नाही. तदनंतर त्याला ती महान गोष्ट प्राप्त झाल्यानंतर समाधान वाटते. मग म्हणतो मी प्राप्त करून घेतली की नाही?

अशी त्याला ग ची पीडा होते. अहंकार निर्माण होतो. त्याप्रमाणे सत् भक्तीसाठी आपण त्या भक्तीच्या अनुसंधनाने मिळालेला सत् भक्तीचा प्रकाश, ती योगीयाची खूण योगीच जाणतो. सत् भक्तीच्या मार्गाने जाऊ लागला, त्याला अनुभव येऊ लागला, अनुभव घेऊन तृप्त झाला, मग तो त्या मार्गाने जाण्याचा स्वीकार करतो. पुढे पुढे गेल्यानंतर अडी अडचणी निर्माण होतात. त्रास होतो. त्रास वाटू लागल्यानंतर अनुभव जरी आला असला तरी त्याचा विसर पडून मार्ग सोडतो का तो? ©️

You cannot copy content of this page