Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? ©️

धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? ©️

धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? मग कृतीमान कधी होणार? मी शेषावर पहुडलो आहे. शेषावर पहुडलेले तत्त्व जर झोपलेले असते, तर मग मी अह:र्निश झोपलेलो असतो, नाही का? तर नाही. मला नाही झोप, नाही जागरण ! रात्र नाही, दिवस नाही ! आकार नाही, विकार नाही ! मग मला कसे ओळखाल?

सेवेकरी आपल्या कर्तव्यात जागृत राहिला, तर तो सुखदुःखाची व्याख्या करील असे मला वाटत नाही. “जे प्रणव टाकले, ते कोणाच्या सत्तेने टाकले जातात?” त्याला भंग आहे का? तर नाही. म्हणून त्याला अभंग म्हटले आहे. किती वर्षापासून हे चालत आलेले आहे? ते खोडून काढण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे का?

ज्या संताने म्हटलेले आहे, “कानी न पडती बोल माझे” | मग बोल कानी पडत नाहीत का? हे लक्षात घ्या.

पूर्व जन्मानुसार सानिध्यात घेतले आहे‌, ते दुर्लक्ष करण्यासाठी सानिध्यात घेतलेले नाही. आपणच शांती मिळवू शकता. सानिध्यातील ज्योतीना शांती देऊ शकता, पण शंका रहित झाले पाहिजे. दररोज गाऱ्हाणी सांगितली, तर भक्तीचे सार्थक होते का? म्हणून सेवेकऱ्यांनो, कोणीही सुखदुःखाच्या वेगळा नाही. ते सुटलेले नाही. फक्त जो अखंड तत्वात रममाण झाला, त्याला सुखही नाही, दुःखही नाही. अशा तऱ्हेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. काहीही त्रास झाला तरी कर्तव्य सोडू नका. (समाप्त)©️

You cannot copy content of this page