Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

गुरु ©️

गुरू कोणाला म्हणावे? कसा असावा?

अनेक अनेक (गुरू) होऊन गेलेत. होणार आहेत. मानव ज्योत आपणाला सत् मार्ग, सत् आचरण, सत् बनविण्याच्या मार्गाला आहे. तेच सत् गुरु असे कोण? याच्या शोधाची प्रत्येक सेवेकऱ्याची धडफड आहे.

सत् गुरु कसे?

सत् आचरण, सात्विकता ज्याच्या रोमारोमात भिनली आहे असे ते सत् गुरु होय. ज्याने आपल्या वाणीने बीजारोपण करुन सर्वस्वाचा ठाव घेतला, ते सत् गुरु होय. ते ओळखण्या साठी सत् शिष्य असावा लागतो. तेव्हाच ओळख होते. ओळखण्यासाठी ज्याने ज्ञानाचे बीजारोपण केले, ज्ञान वृक्षाची भरभराट केली, तेच सद्गुरु होय. ते ओळखण्यासाठी सत् वाणी, सत् आचरण अशा तऱ्हेने त्यांच्या जवळ जाण्यासाठी सत् शिष्याची धडपड असते. या धडपडीने जो ऋणानुबंध, तो साधल्यानंतर शिष्याची तृप्ती होते.

सद्गुरूंचा शोध प्रत्येक शिष्याने करावयाचा असतो. नुसत्या ऋणानुबंधाने ठाव घेणे शक्य नाही. आपल्या ठिकाणीं असणाऱ्या अमृततुल्य ठेव्याचा जो उपयोग करतो, त्याला सदगुरू दूर नाहीत. याच्याच योगाने त्यांना पहावयाचे असते. स्व अनुभव हा श्रेष्ठ आहे. सत् वाणीने, सत् वृत्तीने बीजारोपण केल्यानंतर सद्गुरु दूर नाहीत.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page