Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

कुकर्माचा घडा…©️

कुकर्माचा घडा…©️

श्री समर्थ मालिक – या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ३/४ असत व १/४ सत् आहे. या असताचा पगडा जोराने बसतो म्हणजे सत त्या ठिकाणी लवचिक होते. लवचिक होऊन सुद्धा त्याच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न होतो. असे का होते? याचे कारण एकच, क्रोधाने, मी पणाने, प्रकृतीने गडबडलेल्या ज्योतीना सात्विकता कशी निर्माण होणार? ती ज्योतच वाईट विचारांची आहे. सर्वस्व आसनाचा कारभार त्याच्या हाती पाहिजे होता, पण ते न झाल्यामुळे त्याच्या मनाची अदलाबदल झाली.

हे मानव का सतावतात त्याचे कारण एकच. असत कर्तव्याचा, कुकर्माचा घडा भरून घ्यावयाचा आहे. ते मला करून घ्यावयाचे आहे. घडा पूर्णत्व भरल्यानंतर थोड्या दिवसांनी याची स्थिती काय होईल ते आपणास दिसून येईल. दमाने, धीराने कर्तव्य उज्वल होत असते. आतताईपणाने ते बरोबर होणार नाही. हे कूकर्माचे घडे भरल्यानंतर ते कर्तव्य कायमचे राहते. पुढे त्याच्या कृतीचा प्रकाश चमकू लागला म्हणजे त्याला कुठे टाकायचे ते आपोआप घडते. ती कृती झाल्यानंतर मग सत् भक्तांना त्रास नसतो.

वेळ काळ नजीक आला आहे. पण अशा अघोर मानवाने कितीही प्रयत्न केला तरी काही होणार नाही. या धूर्त लोकांनी ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवात केली होती. थोड्याच दिवसात याचा निर्णय लागेल. कायद्याच्या दृष्टीने जरी निर्णय लागला नाही, तरी अखेर याचा निर्णय मीच लावणार आहे. तो कोणता निर्णय लागेल ते आत्ताच मी सांगू शकत नाही. सत् भक्ताला जितका त्रास दिला, त्याच्या दुपटी तिपटीने त्यांना प्रायचित्त भोगायला लावीन. ते अनुभवण्यास मिळेल. ©️

You cannot copy content of this page