Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

कल्पतरू तळवटी बैसला…©️

कल्पतरू तळवटी बैसला…©️

ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे, राजाची कांता दारोदारी भीक मागत फिरेल का? तिच्या मनाजोगी सिद्धी पावेल की नाही? का तो राजा भिक्षांदेही असतो? पण कल्पतरू तळवटी बसल्यानंतर, त्याची भावना कुठे कुठे जाते?

कल्पतरू तळवटी….. दोन मार्ग आहेत. जो सत् कल्पवृक्षाखाली बसला, तो सत मार्गाने जाणारा असतो. जो अघोर, कल्पवृक्षाखाली बसला, तो अघोर कल्पनेच्या पाठीमागे लागून हैवान बनतो. मग तो स्वयं तत्वापर्यंत पोहोचू शकेल का? पोहोचू शकणार नाही.

कल्प, कल्पना, स्वयम अन् पर म्हटल्यानंतर तुझे माझे निर्माण झालेच की नाही? म्हणून आपणाला जे साधे सोपे सुलभ आहे तोच मार्ग अवलंबन करावयाचा आहे. भयावह म्हणजे भटकतो आहे, यात काय आहे, त्यात काय आहे अशी भावना. तेव्हा जी ज्योत अशी भटकते ती सतात निमग्न होईल का?

जो सत आहे, ज्याला सताचा प्रकाश आहे, तो स्वयं तत्त्वाच्याच पाठीमागे असतो. स्वयं तत्व दिलदार आहे. पण पर जे आहे ते पळ काढतेच की नाही? या ठिकाणी आसनाच्या सानिध्यात त्याला घेतले का? तर नाही. या ठिकाणी अघोराला थारा नाही. मात्र आसना सानिध्यात आहेत त्यांनी आपल्या मार्गाची चाकोरी ढळू देऊ नये. जर ढळली तर त्याच्यासारखा अभागी तोच ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page