Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री ज्ञानेश्वर माऊली…… प्रवचन (३) ©️

श्री ज्ञानेश्वर माऊली…… प्रवचन (३) ©️

सद्गुरु हेच तत्व, मी कोण आहे, याची जाणीव करून देऊ शकतील. सद्गुरु पद हेच सर्व श्रेष्ठ आहे. याच्या पलीकडे काहीं नाही.

आतापर्यंत जे झाले, ते सद्गुरु माऊलीच्या कृपेनेच झाले. त्या गुरू माऊलीच्या कृपे शिवाय काहीच करता येत नाही. मी काय सांगतो याचे मुळीच भान नाही. बोलविता धनी वेगळाच आहे. कोण बोलतो याची जाणीव रहात नाही. हा दिवस अखंड दर्शनाचा असतो. यामुळे जे काही घडले, ते आपल्या चरणांशी रुजू केले आहे.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !

तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!

देवाचे द्वार कोणते? देव म्हणजे कोण? याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपण काय करायला पाहिजे ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक मानव प्राणी षड्रिपूच्या जाळ्यात, मायावी तत्वात गुरफटलेला आहे. हे मायावी बंधन तोडून त्या पदाच्या शोधाची धडपड केली पाहिजे. ती धडपड कोणत्या तऱ्हेची असावी? जो आचार विचार, मनाचा व्यापार सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, तोच देवाच्या द्वारी जावू शकतो. तेथें जाण्यासाठी मार्ग म्हणजे सतभक्ती ! कोठेही जा ! मार्ग वेगळा नाही. फक्त सद्गुरु चरणांचे ध्यान करायचे. त्या चरणापाशी मन पूर्णत्व लीन झाल्यावर, एकाग्र झाल्यावर, त्या द्वारी एक क्षण का होईना उभे राहिल्यावर आपली प्रकृती सद्गुरु चरणी लीन होते व अखंड तत्व प्रगट होते. त्या ठिकाणी लीन झाल्यानंतर कोणत्या मुक्तीचा शोध घ्यायचा?…… पुढे सुरू ©️

You cannot copy content of this page