Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

चौकट मुनी (२) ©️

चौकट मुनी (२) ©️

चौकट मुनी – भक्ती करून घेणारे फार निराळे आहेत आणि कशासाठी भक्ती?

जो मानव सत् पाहण्यासाठी तत्पर झाला आहे, तो काहीही होवो, केव्हाही मागे पुढे पाहणार नाही. ज्याची जितकी उत्कंठा झाली असेल, त्याची ती इच्छा सफल होण्यासाठी, त्याला कशाचेही भान रहात नाही आणि ती सफल झाल्यानंतर दुसरीकडे लक्ष देत नाही. मग अशा सत् भक्ताचा, सत् सेवेकऱ्याचा या कृतीत निमग्न झाला, तो कसा होतो? कोणत्या कारणास्तव होतो? इच्छा काहीही असो, माऊली दयाघन असते. त्या ज्योतीची पाहणी केल्यानंतर समर्थ सुद्धा त्याच्यासाठी राबतात. त्याच्या इच्छेचे फळ त्याला देतात. भक्ती करणारे, करून घेणारी माऊलीच होय.

मात्र स्थूल रूपी मानव पूर्णपणे मायेमध्ये गुरफटला आहे. त्याच्यातून सुटणे कठिण होय आणि त्याच्यातून सुटण्याचा जो प्रयत्न करतो, त्याला माऊली संसारात राहू देत नाही. त्यांना सुद्धा हातभार लावते. परंतु, मानवाने, सेवेकऱ्यानें होता होईल तो मायावी वेष्टण दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत मानव हे मायावी जाळे तोडू शकत नाही, मग माऊली म्हणते, असे जर आहे, तर जाऊ दे ! ती जर तळमळीने तोडण्याचा प्रयत्न करील, मग मात्र माऊली गप्प बसणार नाही. ती त्याच्या साठी राबत असते. मात्र सूक्ष्म सेवेकरी व स्थूल सेवेकरी यात पुष्कळ फरक आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page