श्री समर्थ मालिक - ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत.
सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत. अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे. अशी त्यांची भावना आहे म्हणून अवधी…
श्री स्वयंभू महेश - हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही. गुरुपद म्हणजे आकार आला. मानवाला त्यांची (गुरुपदाची) सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, तो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो. त्याच्या पाया पडतो, पण त्याला बोलता येत नाही अशा गोल आकारी दगडाच्या…
श्री कैलासपती स्वयंभू - जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्!
हे घडते कसे? तोच उपदेश अंबेला दिला कसा? ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन…
श्री कैलासपती स्वयंभू - मी हिमालय पर्वतावर जो बसलो आहे, तो आदेशाप्रमाणेच बसलेलो आहे. या ठिकाणी, आदेश मिळाल्यानंतर यावे लागते, मग आदेश पाळणे, मानणे सेवेकऱ्याचे कर्तव्य नाही का?
जरी माझे नाव स्वयंभू असले, तरी या स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी वेगळा स्वयंभू आहे, म्हणून, मी एक त्यांचा सेवेकरी आहे असे माझे म्हणणे आहे.
महा…
श्री समर्थ मालिक - सद्गुरु चरण ज्यांना कळले आहे, त्यानांच कळले आहेत. असेही काही मानव म्हणतात, हि गुरुगीता स्वयंभूनेच लिहिली आहे का? म्हणूनच एका संताने गीता लिहिली आहे. त्याने अनुभव सिद्धतेनेच लिहिले आहे. जशी ज्याची कर्मगती, तशी त्याच्या डोक्यात बसेल. म्हणून सांगितलेले सत्य आहे.
मी आहे, त्याला आहे ! नाही त्याला नाही ! म्हणूनच…
श्री समर्थ मालिक - यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल. मी सर्व भूतेषु पश्य असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात असेल.
प्रकृती…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी त्याच्यासाठी वशिला लावू नये. जो सात्विक असतो, तो रस्ता चुकत नाही, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर तोच रस्ता चुकतो, तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक दाखवावी लागते.
या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिकासारखे मात्र पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते.
ध्यान कोणाचे करावे? तर आपल्या सद्गुरूंचे हे त्याने ओळखावे.…
श्री समर्थ मालिक - सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. तो मोह असावा, पण कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे मानव लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.
मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर मोहवश होणार नाही.…
श्री विठ्ठल - हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी त्याला काही ना काही करावे लागते. ज्ञान नसते त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो, पण संतप्त न होता गोडीने तत्वाशी झगडणे हे अवश्य कर्तव्य…
सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून चालले आहे.
क्षिराब्धींना आसन आहे अन् या ठिकाणी नाही असे कोण म्हणेल? प्रत्यक्ष कोणाला पाहिजे असेल तर त्याने पाहावे. मानव अंगाने बसणारे त्यांना दिसण्यात येत नाही. प्रकृती ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय…
श्री समर्थ मालिक - अतिशय त्रास होऊ लागला तर त्या ठिकाणी तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते व थोडीशी माघार घ्यावी लागते. परंतु भक्तगणांना जर कां त्रास पडला, तर तो वैतागला जातो.
कर्तव्य करतो म्हणून संदेश दिलेले आहेत. कर्तव्य अस्त्राकडून करून घेवोत अथवा जातीने करून घेवोत हे विचारावयाचे नाही. कर्तव्य पाहण्यात, अनुभवण्यात आल्याशिवाय कर्तव्य चालू…