Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

चैतन्याचा गाभा-©️

श्री विठ्ठल - आम्ही अवतार कार्य घेतो, ते कशासाठी? आदेशाशिवाय आम्ही अवतार कार्य घेतलेले नाही. सताचा नाहक छळ झाला म्हणजे, अवतार कार्य होते. म्हणून सर्वांना उत्पन्न करणारा, तारणारा सर्वभूतेषु पश्य एकच तत्व आहे, त्यांचेच आपण सेवेकरी आहोत. मी तू एकच आहे. फक्त नवा अन् जुना एवढाच फरक आहे. ज्या तऱ्हेची ज्योत त्याप्रमाणे अधिकार अन् त्याप्रमाणे…

Read More

त्रिवेणी संगम – ©️

श्री विठ्ठल – या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. लिनता, नम्रता, शांती आहे. “देही देखीली पंढरी | आत्मा अविनाश विटेवरी ||” असे एका संताने म्हटले आहे. त्याने प्रत्यक्षातही अनुभवले आहे. ज्या ठिकाणी शांती आहे, तेथे तत्त्व असणारच. जेथे तत्त्व आहे, तेथे शांती आहे. शांती हीच रुक्मिणी आहे. याच्यापेक्षा महान शक्ती आहे तिला महामाया म्हणतात.…

Read More

मऊ मेणाहूनी आम्ही -२-©️

तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या कर्तव्याला पाठ दिली का? तो आपल्या नादातच होता. कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का? मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी आहे, त्यालाच…

Read More

मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | ©️

श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे | मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी कोण होता? संत तुकाराम मऊ होऊनच वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला, कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे त्याने सांगितले. म्हणून वज्रापेक्षाही कठीण असले तरी लवचिक कसे होते, कसे करावे हे तुकोबाला माहित होते…

Read More

मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – ©️

मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – जोपर्यंत स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळत नाही, तोपर्यंत मोक्ष नाही. स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळणे हीच मुक्ती आणि हाच मोक्ष आहे. प्रथम भक्ती श्रेष्ठ ! त्यात त्याला मुक्ती मोक्षाची गती नाही. सूक्ष्माची गती सद्गुरु देतात. मग तो सूक्ष्मात तल्लीन होतो. त्याचे सूक्ष्म त्याला दिसते. त्याच्यात रममाण झाल्यानंतर – कारण, महाकारण येथपर्यंत…

Read More

समर्थ प्रवचन – ©️

श्री समर्थ एकचित्त – सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे थोडे मागे पुढे होते, त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले, तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते. कोणतीही घडण घडविण्यासाठी…

Read More

सेवेकऱ्याचे वागणे ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबाराच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी मला कोण बोलणार आहे? येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम…

Read More

भूमी शुद्ध करूनी-२-©️

पांडवां सारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे कोणी नव्हते. त्यांच्यासारख्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झळ लागली. ती त्यांनी सहन केली. त्यानंतर कौरवांचा नाश करण्यात आला. हे का? कौरव पांडव हे नातलगतच होते. कौरवांची बुद्धी सात्विक का झाली नाही? का होऊ शकली नाही? ज्यांची कृती सात्विक असेल तरच ते सात्विक होतील. कौरवांची भावना शुद्ध नव्हती म्हणून वृत्ती…

Read More

भूमी शुध्द करुनी……©️

श्री समर्थ मालिक - श्रीकृष्ण जयंती - या ठिकाणी ज्ञानच भरलेले आहे, परंतु घेणारा पाहिजे. ज्ञान साधे, सोपे, सुलभ तितकेच ते कठीणही आहे. कठीण कोणाला अन् सुलभ कोणाला? करील त्याला सोपे आहे, न करील त्याला कठीण आहे. मी ज्यावेळी प्रत्यक्षात अवतार कार्य नटविले, ते कोणत्या कारणाने घेतले? त्यावेळी सेवेकरी, मानव प्राण्यांना भयंकर त्रास होता,…

Read More

ठामपणा येता अंगी….©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबाराच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी कोण बोलणार आहे? येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे,…

Read More

स्वधर्म अन् परधर्म -३-©️

मालिक – स्वधर्म हे निधान आहे. धर्म म्हणजे कोणता धर्म? धर्माच्या व्याख्या दोन आहेत – धर्म म्हणजे मानव धर्म ! (१) भिक्षुकाला धर्म म्हणजेच दान देणार, तोही धर्म आणि (२) सत् कृतीने मानवात जाणे तो ही धर्म ! पांडवांमध्ये धर्म होता, तो ही धर्म !…

Read More

स्वधर्म अन् परधर्म -२-©️

मग, स्वधर्म श्रेष्ठ कां परधर्म? जो सत् प्रविण आहे, सत् पुत्र आहे, सतभक्त आहे, त्याला कसलीही उणीव पडणार नाही. उणीव भासू देणार नाही. ज्ञानेश्वरांनी विचारणा केलेली आहे, राजाची कांता दारोदारी भिक मागत फिरेल कां? तिच्या मनाजोगती सिध्दी पावेल कि नाही? का तो भिक्षांदेही असतो? पण कल्पतरु तळवटी बसल्यानंतर त्याची भावना कुठेकुठे जाते? पण कल्पतरु…

Read More

You cannot copy content of this page