मग, स्वधर्म श्रेष्ठ कां परधर्म? जो सत् प्रविण आहे, सत् पुत्र आहे, सतभक्त आहे, त्याला कसलीही उणीव पडणार नाही. उणीव भासू देणार नाही. ज्ञानेश्वरांनी विचारणा केलेली आहे, राजाची कांता दारोदारी भिक मागत फिरेल कां? तिच्या मनाजोगती सिध्दी पावेल कि नाही? का तो भिक्षांदेही असतो? पण कल्पतरु तळवटी बसल्यानंतर त्याची भावना कुठेकुठे जाते?
पण कल्पतरु…
स्वधर्म म्हणजे काय? अन् परधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे तो सतपूर्ण आहे, ज्याच्या मुखावर सताची झलक असते, ज्याची सतकृती आहे, सतभक्तीत रममाण आहे, तोच खरा तो धर्म होय. असा भक्त भिक्षांदेही नसतो. त्याची इच्छा पूर्ण होते. तो स्वयं तत्त्वावर अवलंबून असतो. जो सतमार्गाने, सतधर्माने जातो, त्याला दुसरीकडे भिक्षा मागण्याची जरुरी नसते.
पर म्हणजे अंधार,…
मानव म्हणतात हा वेडा आहे. त्याच्या संगतीत राहून उपयोग नाही, पण त्याचे जे बळ असते त्याची खूण गांठ त्याने बांधलेली असते. त्याने निश्चयाचे बळाची शक्ती वाढविलेली असते. ती कोणालाही तोडता येणार नाही. नंतर अडी अडचणीतून त्याचा कस घेतला जातो. त्या कसातून उतरल्यानंतर त्याचे फळ त्याला मिळते. मग समर्थ त्याला अनवाणी पाठविणार नाहीत. त्याच्यावर पूर्ण लक्ष…
निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती वस्तू साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही. प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो, त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो, महान पर्वत, काटे कुटे, जंगल झाडी, अशा…
नामाची मूळ उत्पत्ती कशी झाली? मूळ ओंकारापासून ध्वनी निर्माण झाला. त्यातच नाम प्रगट झाले. त्यापासूनच मनुष्य निर्माण झाला. मनुष्याला तारण्यासाठी भक्ती निर्माण झाली. सद्गुरु तारक या पदापासून सर्वस्वाचा उद्धार!
सद्गुरु कसे आहेत? कोणत्या तऱ्हेचे आहेत? त्याची ते ओळख देतात. सद्गुरु नाम देवून आकारी प्रसवले आहेत. आसन कोणत्या तऱ्हेचे आहे? स्थूल, सूक्ष्म कोणत्या तऱ्हेचे आहे,…
साक्षात मालकांचे बोल - मानव धर्म श्रेष्ठ ! मानव धर्माचा उद्धार करणे श्रेष्ठ ! या दोहोंमध्ये मनुष्य श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ याचे विवरण केले. ज्या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती !
नाम कोणत्या तऱ्हेने झाले…
संताचे अभंग असे किर्तीरुप मागे राहतात. त्यांना भंग नाही. असताची किर्ती काही काळच मागे राहते, पण सताची किर्ती अभंग आहे. आतापर्यंत काही किर्तीरूप संतांनी विवरण केले आहे त्याला भंग आहे का? म्हणून अशा तऱ्हेने मानवाने जावे.
काही मानवांचे नाक मुरडणे काही गेलेले नाही. कारण त्यांना भक्तीचे मूळ सापडले नाही. ज्याच्या ठिकाणी द्वैत भक्ती आहे,…
नभासारीखे रुप या राघवाचे । मनी चिंतीता मूळ तुटे भवाचे ।। नभ म्हणजे काय? नभासारीखे रूप म्हणजे काय? इतकेच सांगता येईल की, त्याचे चिंतन केले किंवा आकाशासारख्या रंगात जर तो अह:र्निशी चिंतनात राहिला, तर त्याला काही न्यूनता नाही. त्याचे सर्व शरीरात रूप भिनले जाते.
भव म्हणजे काय? आणि भय म्हणजे काय? संसारात भक्ताला कोणत्याही…
आजचा महान दिवस आहे. किती मानव त्या ठिकाणी तल्लीन झाला आहे ! पण कोणी शोध घेतला आहे का? तो आपल्या कृतीने रममाण झाला आहे, पण कोणी शोध घेतला आहे का? कोणीही बोट दाखविणार नाहीत की, या ठिकाणी विठ्ठल हे तत्त्व आहे. असे ओळखणारे फार थोडे आहेत, पण शक्ती नाही. शक्ती आहे पण भक्ती नाही, श्रद्धा…
मी कोण, कोठे जाणे आहे, कोठून आलो, हे त्याला सापडत नाही. तेव्हा त्याला स्थिर करण्यासाठी तत्वे निर्माण केली. सर्वश्रेष्ठ असे जे पद म्हणजे सद्गुरू पद ! त्यांच्या सानिध्यात गेलात की, त्याचे सर्वस्व शुद्ध होत असते. मानव सत मार्गाने जाता जाता, त्याचे मन पूर्णत्वाने अर्पण होते, अन मग तो त्या ठिकाणी स्थिर होतो. तोच प्रकाश! त्या…