श्री समर्थ मालिक - प्रणव निर्माण कसा होतो? कोठे जातो आणि कोठे लय होतो? प्रणव जो आहे तो अखंड आहे. अखंड अखंडात विलीन होते. प्रणव आकारी पण आहे आणि निराकारी पण आहे. प्रणव जर बंद पडला तर बाकी काय चालते का? तर नाही.
मी जो आहे तो नामातच आहे. क्षरात आहे, अक्षरात आहे. चरात…
श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुनर्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी, प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो. पण कोणाच्या प्रेरणेने याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर…
या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले पाहिजे नंतर सांगितले पाहिजे. ते तुम्ही कृतीत आणा.
चआपल्या सेवेकऱ्यांजवळ अजूनही समतेचा पाझर फुटलेला आहे असे दिसत नाही. अजूनही हेवे दावे गेलेले नाहीत. अजूनही एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही. मला सांगा, आपणात एकमेकांविषयी…
श्री समर्थ मालिक – अविद्येचे मूळ पर ते उपडोनी सांडू | आशा मनीषा कृष्णा काम क्रोध कुरवंडू || ज्याने अविद्येचे मूळ उखडले, आशा, मनीषा, तृष्णा, काम, क्रोध यांची कुरवंडी केली, त्यांनीच हे म्हटलेले आहे. तेव्हा ते लिखाण पाहून सेवेकरी तसे प्रयत्न करीत आहेत का? अविद्येला, मूळ मायेला उपटून टाकण्याचा प्रयत्न होईल का? जोपर्यंत सेवेकर्याच्या अंत:र्यामी…
तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला, तरी त्याने आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरविली काय? तो आपल्या नादातच होता. कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का?
मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी आहे,…
श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे |
मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी कोण होता? संत तुकाराम ! मऊ होऊनच त्याने वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला, कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे त्याने सांगितले. म्हणून वज्रापेक्षाही कठीण असले तरी लवचिक कसे होते, कसे करावे हे तुकोबाला…
श्री समर्थ मालिक - जोपर्यंत स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळत नाही, तोपर्यंत मोक्ष नाही. स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळणे हीच मुक्ती आणि हाच मोक्ष आहे.
प्रथम भक्ती श्रेष्ठ ! त्यात त्याला मुक्ती मोक्षाची गती नाही.
सूक्ष्माची गती सद्गुरु देतात, मग तो सूक्ष्मात तल्लीन होतो. त्याचे सूक्ष्म त्याला दिसते. त्याच्यात रममाण झाल्यानंतर कारण, महाकारण येथपर्यंत गती…
श्री समर्थ मालिक - खरे आहे ! मन मोठे चमत्कारीक आहे. मनाच्या ठिकाणी एक दृष्टी असते, त्यामुळे म्हणतो, मालिक, तुम्हीच सर्वस्व करा. त्याचा तो कुटुंबासहित सुखी असतो. नोकरी तब्येत याबाबत नेहमी तक्रारी असतात.
पूर्वीचे मानव, योगी हे मनाने ठाम होते. आपण ठाम असता कधी? जो मनाने ठाम, तो सतात रममाण होतो. दरबार नंतर समजू लागतो.…
श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबारच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी मला कोण बोलणार आहे?
येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम…
असे काही विचार करीत बसाल की असे होणार, तसे होणार हे म्हणणे साफ चुकीचे आहे. पांडवांसारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे कोणी नव्हते. त्यानां सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झळ लागली. ती त्यांनी सहन केली. त्यानंतर कौरवांचा नाश करण्यात आला. हे का करण्यात आले? कौरव पांडव हे नातलगतच होते. कौरवांची बुद्धी सात्विक का झाली नाही? का होऊ शकली…
श्री समर्थ मालिक – मी एकदाच प्रणव दिलेला आहे. ते प्रणव खोटे होऊ देणार नाही. हे सत्य आहे. कर्तव्यात सेवेकर्यांनी पाठीपुढे व्हावयाचे नाही. बाकीचे काही बोलता येत नाही. ते कसे करावयाचे ते माझे मी जाणतो. वेळ जवळ जवळ येत चालली आहे. सेवेकर्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. नाही पेक्षा सेवेकरी माझ्या दृष्टी आड येतात. नजरेसमोर येतात. त्यांचा…
आजचे दिवस हे फार अहंकारात चाललेले आहेत, अन् या अहंकारावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र भूमी शापातून मुक्त करावयाची आहे. तेव्हा ही घुसळण झाल्याशिवाय भूमी शुद्ध होणार नाही. ही घुसळण करणारच हे मात्र सेवेकर्यांनी विसरता कामा नये.
दुसरी गोष्ट, असे होणार, तसे होणार हे म्हणणे साफ चुकीचे आहे. पांडवांसारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे…