Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

नामाचा महिमा-२-©️

नामाचा महिमा-२-©️

तुकाराम महाराज – “ब्रह्मानंदी लागली टाळी। कोण देहाते सांभाळी ।।’’ ही टाळी लागल्यानंतर नारायणाला शोधण्यास कोठेही जावे लागत नाही. स्वर्गात, मृत्यूलोकात कोठेही जावे लागत नाही, तर त्याचे अस्तित्व सतशुद्ध (चरणातच) अंत:करणात असते. त्याला शोधण्यासाठी सतशुद्ध आचरण ठेवले पाहिजे, मग अनंत लांब नाहीत. त्याचे साधन एकच हे नाम आहे. सतशुद्ध सात्विक आचरण आहे. अशा तऱ्हेने नाम घेतो, त्याच्यासाठी नाम आहे. ते सद्गुरु मुखातूनच मिळावयास पाहिजे. ज्याला ते मिळाले तो पांडुरंगमयच होतो. ज्याचे मन पांडुरंगमय झाले, त्याच्याच शोधात पांडुरंग असतात. बसल्या ठिकाणी गती देऊन विलीन करून घेतात.

विचलित झालेली मानवांची मने स्थिर करण्यासाठी, मी किर्तन करीत होतो. यासाठीच मला पाठविले होते. श्रवण, मनन, कीर्तन ही प्रथम पायरी आहे. या ठिकाणची (दरबारची) गती ही पुढची पायरी आहे.

कीर्तन ही प्रथम पायरी आहे. अभंगातून नामाचा महिमा अगाध आहे हेच सांगितले आहे. सत शुद्ध अंतःकरणाने विधीयुक्त रितीने साठा केला तर अनंत लांब नाहीत. तो भक्त त्यांना शोधीत नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंग भक्ताला शोधत येतात, असे ते एकच बीज आहे. ते सर्वत्र विखुरले आहे. असा नामाचा महिमा आहे. भक्तीचे साधन नाम आहे. भक्ती कठीण नाही. एकच, एकाग्र चित्ताने चिंतनमय होऊन, नाममय होणे, मग अनंत दूर नाहीत. या ठिकाणी जे सत भक्त आहेत, ज्यांना सत सानिध्य प्राप्त झाले आहे, या ठिकाणी अखंड नामाचा प्रवाह आहे. ज्यांना हे नाम मिळाले ते सतगतीत गेल्याशिवाय कधीही राहणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page