Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सद्भावना, भाविकता….. ज्ञानेश्वर ©️

सद्भावना, भाविकता….. ज्ञानेश्वर ©️

सद्भावनेने, भाविकतेने ज्या ज्योतीने जे बहाल केलेले आहे ते समाधीवर रुजू होणारच. पूर्ण श्रध्देने केलेले कार्य, कोणते कां असेना सद्गुरु चरणांवर रुजू होते. त्यामध्ये सद्भावना सतगती नसेल तर ते होणार नाही.

मनुष्य हाच ईश्वरी अवतार आहे आणि त्यातच सर्वस्व बीजारोपण आहे, पण मानवाला त्याची जाणीव नसते. त्याची जाणीव होण्यासाठी मनुष्य देह आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणाचा अवतार आहे याची गती मिळाली मग त्याची सेवा रुजू होते. माझ्या अंत:र्यामी कोण आहे याची गती मिळेल व त्या गतीने जो जाईल, तरच सर्वस्व होईल.

मानवाची मानवता सिद्ध करण्यासाठी, ज्यांनी हे सर्वस्व निर्माण केले, त्यांना डोळे भरून पाहणे व त्यांची सद्भावनेने गती घेणे हे आद्य कर्तव्य आहे. मायावी गती सांभाळून सद्भावनेने, भाविकतेने, सत गतीने जाईल, तर त्याला साध्य होण्यास विलंब नाही. या गतीने आचरण पण पाहिजे.

आपणाजवळ कितीही ज्ञान असले तरी त्यांची जोपासना करण्यासाठी सद्गुरु पाय धरावे लागतात. आपली पण तिच स्थिती आहे. ती सहज साध्य नाही. त्यासाठी कोणाला तरी मानावे लागते. कोणतीही गती पाहून भागत नाही. त्याला प्रत्यक्ष काठीचा आधार घ्यावा लागतो आणि ही काठी म्हणजे साक्षात आपले सद्गुरु !!! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page