Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

आत्मा बाहेर पडताना……©️

आत्मा बाहेर पडताना……©️

आत्मा बाहेर पडताना, प्रकृती अंगापासून बाजूला होताना, त्यावेळेस ज्योतीला तेज चढते.‌ बाजूला झाल्यावर ज्योत‌ निस्तेज बनते.‌ ती कां? अविनाशी आत्मा हृदयरुपी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तेज कोठून राहणार? हा आत्मा आहे तोपर्यंत चलन वलन राहते.

मानव जर ईश्वर असेल, तर त्याची ही स्थिती का असावी? अविनाशी आत्मा शांत असतो. मानवांची मने, त्याप्रमाणे ते स्थिती करून घेतात. त्याला मालिक काय करणार? मानव ईश्वर तो कसा? पाहण्याची धडपड करा. नामस्मरणात दंग व्हा.

अविनाशी आत्मा प्रगट होतो. तो प्रगट होण्यासाठी काय करावे? मानव असत कृतीने गेल्यास तो प्रगट होत नाही. सर्वस्व सत् गतीने गेल्यास तो प्रगट होतो. जो बोल बाहेर फेकला, तो बोल शेवटपर्यंत कायम ठेवा. ठामपणा ठेवा. कार्य प्रविण होईल. प्रत्येक बोलाला महत्व असते. तो बोल म्हणजे ब्रह्म बोल होय. मानवाना कळत नाही. जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपली कृती काय? हे त्याला कळत नाही. याची जाणीव त्याला होत नाही. जन्माला आल्यापासून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्याचे दर्शन एकदा तरी घेणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. (१)©️

You cannot copy content of this page