Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

होळी २०२४ ©️

होळी २०२४ ©️

होळी – २०२४

मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी, हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. होळीच्या दिवशी होलीका दहन करतात आणि पुरणाचा नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून अग्नि देवतेला नमस्कार केला जातो.

हे पण राक्षसी होलिकेचच दहन असतं. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. हे जरी खरे असले, तरी आपण जी होळी साजरी करतो ती असतं नसून सत होळी होय.

यामध्ये आपण होलीका दहन करण्यापूर्वी स्नान करून शुध्द अंतःकरणाने, शुध्द भावनेने, शुध्द चित्ताने या पवित्र अग्निला साक्ष ठेऊन आपल्यातील अवगुणांना तिलांजली देण्याचे कार्य करायचे असते आणि येणारे वर्ष सुख, समृध्दीने, आरोग्यदायी, मंगलमय, आनंददायी जाण्यासाठी त्या आपल्या सत्याकडे मागणे मागावं यांचे असते.‌

हा दिन म्हणजे सताचा असतावर विजयोत्सव असतो. या सणाच्या निरनिराळ्या आख्यायिका आहेत, त्यामध्ये न जाता…….आपण होळीच्या या पवित्र अग्निमध्ये सर्वस्व असत गोष्टिंचा स्वाहा:कार करून आयुष्यातील नविन पर्वाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावयास हवे…..

होळीच्या या पवित्र सणामध्ये सर्वसामान्यतः माणूस अघोरी कृत्यांचा सहारा घेऊन वाईट कुकर्मे करण्याचा प्रयत्न करतो…..पण आपण सन्मार्गी माणसांनी अशी कृत्ये टाळून, सन्मार्गाने जाऊन, या पवित्र अग्निच्या सहाय्याने पवित्र कर्तव्यें पार पाडण्याचा मानस उद्घोषित करून, सत् मार्गावर चालण्याचा मनोदय व्यक्त करून, पुढील काळात तसे वागण्याचा निश्चय करून मार्गस्थ व्हावयाचे असते……..हिच खरी आपली होळी………!!!

कालच्या या होळीची कांही क्षणचित्रे येथे व्हिडीयोच्या माध्यमातून आपणांपर्यंत घेऊन आलो आहोत………©️

You cannot copy content of this page