Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

महाराष्ट्राच्या उद्धारासाठी…©️

महाराष्ट्राच्या उद्धारासाठी…©️

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन केले आहे, सांगितले आहे. शाप संपूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यातून मुक्तता झालेली नाही. उ:शाप दिलेला होता तो संपूर्ण नव्हे, पण संपत आलेला आहे. तो संपल्यानंतर भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ही महाराष्ट्र भूमी चमकेल. महाराष्ट्र भूमीच्या उद्धारासाठी हे अवतारकार्य महाराष्ट्रात नटवले आहे.

या आसनाचे ठिकाणी अनेक तऱ्हा नटवल्या आहेत. ही भूमी शाप मुक्त करण्यासाठी, अनेक अवतारकार्ये नटवली आहेत, संत निर्मिती केली. तो काळ समीप आला आहे.

या ठिकाणी या भूमीत अघोरांनी धुमाकूळ घातला. ऋषिकुळे गायब केली. त्यांना मुक्त करण्याचे कर्तव्य या आसनाने पार पडले. त्याचाच हा आनंद आहे. ज्यावेळी संपूर्ण शाप मुक्तता होईल, मग संघर्षण अजिबात राहणार नाही.

या आसनाला चकविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे, पण आसन चकलेले नाही. याचे चक्षुतून काही एक सुटणार नाही,‌ सुटले नाही व सुटू शकणार नाही. आज जरी संघर्षण असले तरी उद्या आनंद होणार आहे. त्यासाठी या आसनाने कर्तव्य शिरावर घेतले आहे. आपण एकमेकांचे सानिध्यात राहून कर्तव्य पार पाडलेले आहे. महान महान असुरांशी संघर्षण करून कित्येक चमत्कारिक कृत्ये उजेडात आणलेली आहेत, त्याचे कारण एकच, सेवेकऱ्यांना दाखवण्यासाठी. ©️

You cannot copy content of this page