Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

गुरुपद आणि कालचक्र ©️

गुरुपद आणि कालचक्र ©️

श्री समर्थ मालिक – प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्यांच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत, ते श्रेष्ठ आहेत. हे नाते अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात.

सद्गुरूंच्या मुखातून मिळालेले अमृततुल्य प्रणव जतन करणे हे सेवेकऱ्यांचे महान पवित्र कर्तव्य आहे. कालांतरापासून सेवेकरी आणि सदगुरू, गुरु आणि शिष्य हे नाते फार श्रेष्ठ आहे, अखंड आहे. आपल्या सेवेकऱ्याला शुद्धीवर आणण्यासाठी ते लाघव करतील, नाना तऱ्हा करतील, वेळेला शिक्षाही करतील. पण ते दूर फेकणार नाहीत हे सेवेकर्‍यांनी ध्यानात ठेवावे.

हे आसन बघितले तर काही दिसणार नाही. प्रकाशमान सेवेकऱ्यांनी चाचपून बघावे. कोणत्या तर्‍हेचे आहे? याची पूर्णत्वाने छाननी करावी. अनेक वेळेला ऐकले ते सेवेकऱ्यांच्या हृदयी बिंबले पाहिजे. पूर्णत्वाने समजले पाहिजे, तरच त्याला महत्त्व आहे. मानवांना, सेवेकऱ्यांना गती जरी आहे, तरी त्यांची इच्छा होते. मालिक प्रत्येक वेळेला संदेश देतात. वर्ष येते आणि जाते. पण त्याला अंत नाही. जो संदेश दिला, त्यात मागे पुढे होणार नाही. असत होणार नाही. पण काही काळ, अन्यत्र कारणांमुळे मागे-पुढे होत असते. कारण जगाची रचना निराळी आहे. कालचक्र हे सारखे फिरत असते. देवाण-घेवाण ही चालू असते. तरीपण कालचक्र हे थोड्या कारणाने मागे-पुढे होते. जे घडणार आहे ते घडणारच ! याबाबतीत थोड्याच अवधीत आपणाला संदेश मिळतील. कालचक्र हे फार निराळे आहे. ©️

You cannot copy content of this page