Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

हरिहर ब्रह्मादिक….प्रवचन ©️

हरिहर ब्रह्मादिक….प्रवचन ©️

श्री समर्थ रामदास स्वामी –

हरिहर ब्रह्मादिक | नाश पावती सकळीक ||

सर्वदा अविनाशी एक | सद्गुरु पद ||

ह्या परम श्रेष्ठ पदाचा महिमा माझ्या सारख्या यत् किंचित पामराने कोठवर वर्णन करावा? अविनाशी पद काय आहे? त्याचा कधीही विनाश होत नाही.‌ कोणी करणारा नाही.‌ करविता नाही. केलेला नाही. अशा परम पदाचा महिमा माझ्या सारख्या यत् किंचित पामराने कोठवर वर्णन करावा? त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी अनेक योगी, ॠषी, मुनी अनंत काळ ध्यानमग्न होऊन बसले आहेत.‌ त्यानांही थांगपत्ता लागलेला नाही.

श्रृती, स्मृती, वेद पुराणे नेती नेती म्हणून थकून गेली आहेत.‌ मी माझ्या अल्प बुध्दी प्रमाणे वर्णन केले आहे.‌

हरिहर आणि ब्रह्म हे अशाश्वत आहेत. म्हणजेच नाश पावणारे आहेत.‌ या तत्वांपेक्षा सत् हे तत्व अत्यंत श्रेष्ठ आहे. याच तत्वामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतात. हे चक्र अहोरात्र सतत चालू आहे. याचमुळे या तिन्ही तत्वांची ही संघटना एके ठिकाणी होऊन त्या सर्वांवर श्रेष्ठ असे जे पद तेच अविनाशी होय. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही तत्वे ज्या ठिकाणी विलीन झाली आहेत, असे जे श्रेष्ठ पद तेच अविनाशी होय. त्या दिवशी अखंड तत्व प्रगट होते, त्यामुळे दर्शनाची तन्मयता लागली होती. तस्मात् सेवेकऱ्यास एकचित्तता साधता आली नाही. यामुळे असे झाले. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page