Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सद्गुरु सेवा ©️

सद्गुरु सेवा ©️

एखाद्या सेवेकऱ्याचा अनुभव, आजच्या दर्शनाचे वर्णन, आजपर्यंत जी सेवा केली त्याचे प्रतिक, त्याचे दर्शन, वर्णन तेच प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे.

प्रत्येक सेवेकऱ्याने, आपल्या सदगुरुंनी सत् पदाच्या आसनावरून जे अखंड नाम दिले आहे, त्याचेच नामस्मरण करने, त्यात निमग्न राहणे. आपले मालिक आपल्या पाठीवर आहेत ही भावना ठाम ठेवल्यास त्यांना पाहता येईल. त्यांचा ठाव घेता येईल. तशी भावना न ठेवल्यास त्यांना पाहता येणार नाही.

या दरबारची स्थिती फार निराळी आहे. कितीतरी अखंड ज्योती या दरबारात येण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांच्या कर्मसंचिताप्रमाणे आडपडदे दूर झाल्यानंतर त्यांना तो लाभ मिळणार आहे. काळ समिप आला आहे. उघड होण्याची वेळ आली आहे. ज्यावेळी उघड होईल, त्यावेळी स्थिती फारच निराळी होईल.

या ठिकाणी अखंड तत्व राबत आहे. सेवा, सेवेकरी, सद्गुरु भक्ती ही अखंड सारवण याचा अर्थ फार खोल, फार निराळा आहे. सेवा कोणत्या तऱ्हेची, किती तऱ्हेने सदगुरू सेवा, कोणत्या कोणत्या तत्वाप्रमाणे तन, मन, धन यांच्या पेक्षाही चौथी सेवा अमूल्य आणि मार्मिक आहे. ती सेवा कोणती?

जे मनाच्या पलीकडेही जी शक्ति, त्या शक्तीचे अर्पण सदगुरू चरणांवर असल्याशिवाय सेवा रूजू होत नाही. सेवा आणि सदगुरू याचा अर्थ ज्यांना मान्य नाही, तो सेवेकरी नव्हें. ©️

You cannot copy content of this page