गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी सतोपदेश करीत होते. ज्यांनी तो ग्रहण केला त्यांना ठेवले, बाकीच्यांचा नाश झाला.”
गुरुदेव पितामह सत युगापासून कर्तव्य हाकीत आहे. कर्तव्य म्हणजे संयमनाचे कर्तव्य! अघोरांना देखील सतोपदेश करीत होते, तो त्यांनी ग्रहण न केल्यामुळे कोणती स्थिती झाली? जे प्रणव आपण देत आहात ते मी ही देत होतो. त्यामुळे मला पूर्णत्व कल्पना आली आहे.
एका सत ज्योतीमुळे अनेक ज्योती संरक्षण घेऊ शकतात. एक ज्योत सात्विक व अनेक ज्योती अघोर असतात. त्या अनेक ज्योतींच्या स्थितीमुळे कलियुगी स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून जे अनंताने प्रणव दिले ते पूर्णत्व आहेत.
गुरुदेव पितामह म्हणतात, “सत पदोपदी दृश्याला प्रणव देत असतात, त्या मानवाने इतरांना प्रणव दिलेच पाहिजेत. ते जर ग्रहण केले नाहीत तर ज्याचा तोच जबाबदार !
अवधीतीलच ह्या २६ व्या अवतार कार्यात सद्गुरु माऊलिंनी वीस वर्षे शुद्धीकरण घेतले ते अदृश्याने. ते अदृश्याचे शुद्धीकरण होते. दृश्य शुद्धीकरण वेगळे आहे.
गुरुदेव पितामह म्हणतात, “दृश्य शुद्धीकरणा शिवाय ही कलियुगी स्थिती नष्ट होणार नाही. जो सतमय स्थितीने कर्तव्य करीत आहे त्यावर सताचे पूर्णत्व लक्ष आहे.” जर सतमय स्थिती नसेल तर कोणती स्थिती होणार? सद्गुरु फक्त आदेश देणार अन त्रिगुण कर्तव्य करणार ! स्थिती स्तब्ध करणे ही अनंतां जवळ गती आहे. पूर्णत्व मानवांनी कल्पना घेतली पाहिजे आणि समजले पाहिजे, “मी सत कर्तव्यात राहीन, तर सत माझे अवश्य संरक्षण करील.” ©️
