Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

संसार – श्री रामदास स्वामी ©️

संसार – श्री रामदास स्वामी ©️

समर्थ रामदास स्वामी –संसार –

संसार त्रिगुणात्मक आहे. त्या संसारात राहूनच सगुनाचे सार घेणे. याचेच नाव संसार होय. याच्यातच सदगुरू पूर्णपणे भरलेले आहेत. याच्या निराळा संसार नाही. सद्गुरु सुद्धा संसारमय आहेत. ज्याने संसार नीटनेटका केला, त्याला परमार्थ साधता येतो.

संसार हा मार्ग आहे. त्या मार्गातूनच निर्गुणाचा शोध घ्यावयाचा. ते शोधण्यासाठी संसाराचा सार घ्यावयाचा असतो. तो सार घेतल्याशिवाय मिळणार नाही. संसार म्हटल्यानंतर मायावी भ्रमण आहे. मायावीमध्ये सदगुरू पूर्णपणे भरलेले आहेत. ते त्रिभुवन व्याप्त असून अलिप्तही आहेत. संसारात राहूनच त्रिभुवन व्याप्त सदगुरू कसे आहेत ते पहावयाचे असते. ते पाहिल्या नंतरच अलिप्त सदगुरू कसे आहेत, याची जाणीव मिळेल. संसार याचा अर्थ काय आहे?

सगुनमय दिसणारे सर्वस्व बीजारोपण म्हणजेच संसार होय. स्वतःचा परिवार, बायका, मुले म्हणजे संसार नाही. संसार हा फार व्यापक आहे. जे जे सचेतन, जे सदगुरूमय आहे, ते पहाण्यासाठीच संसार आहे. आपले घर, कुटुंब हा संसार नव्हें. कोणीही असो, त्याची प्रेरणा, सद्भावना यांचे मिश्रण ज्याठिकाणी, तोच संसार होय.

संसारामध्ये ज्याठिकाणी सत्, त्याच ठिकाणी सदगुरु आणि हा संसार सागर ओलांडून ते परब्रह्म निर्गुण पद आणि पलीकडे गेल्यानंतर तेजोमय वलय ! हे सर्वस्व स्पष्ट पहाण्यासाठी, निर्गुणपद अनुभविण्यासाठी संसार हि प्रेरणा केली आहे. संसार कशासाठी?

संसारामध्ये षड्रिपू अहोरात्र जागृतीत खडे असतात. ते कशासाठी? तर सगुनाचा सार घेत घेत निर्गुनाप्रत न्यावयासाठी. ज्याने सताची कास धरली, त्याला षड्रिपू स्वतःचा दास न बनविता, तेच त्याचे दास बनतात. जो सदगुरु चरणात लीन आहे, त्याला माया दास बनवित नाही. तर त्याची दासी बनते. संसार सागर ओलांडण्यास किती वेळ लागणार? संसार हा प्रत्येकाने आनंदमय वातावरण निर्माण करून, केला पाहिजे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page