Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

संवाद तुकारामांशी…©️

संवाद तुकारामांशी…©️

श्री संत तुकाराम महाराज ()

सद्गुरु बाबा : चैतन्यात लय झाल्यानंतर दर्शनाची अपेक्षा असते का? (चैतन्यात लय येणे स्थिती – स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारण अशा स्थितीने भक्ताला भगवंत आपल्यात सामावून घेतात ती स्थिती)

संत तुकाराम : चैतन्यात मी लय कसा, तर (आपल्याच) ध्यानात असतो. (येथे तुकाराम महाराज हि स्थिती स्पष्ट करताना म्हणतात, जरी मी चैतन्यात लय असलो, तरी सुद्धा मी सताच्या ध्यानात, नामस्मरणात असतो), पण त्या ध्यानातून जाग आल्यानंतर आपले दर्शन मिळावे हि इच्छा असते. पुढे ते म्हणतात, “परंतु सता येथेच दर्शन होते. परंतु प्रत्येक सेवेकर्‍याची इच्छा असते कि प्रत्यक्ष दर्शन घडावे. तेव्हा वर्षातून एकदा तरी सेवेकर्‍याला दर्शन मिळावे.

संत तुकाराम पुढे म्हणतात, सता! पांडुरंग अन आपण वेगळे आहात का? आम्ही आपणाजवळ काय निवेदन करावे?

सद्गुरु बाबा : त्यांनी आपणास चैतन्यातून याचसाठी पाठविले, मग ते कसे काय असतात, काय सांगायचे ते सांगा.

सद्गुरु बाबा : विठ्ठलाची श्रेष्ठता मोठी आहे. आम्ही पण सेवेकरी आहोत. (येथे श्री सद्गुरू माऊलींची लिनता आणि नम्रता दिसून येते.)

संत तुकाराम : आम्ही आपले सेवेकरी, आम्हास तर माहित नाही. आम्ही सर्वस्व एकच समजतो. आपल्या सानिध्यात आल्यानंतर नाराज का होणार आहे?

सद्गुरु बाबा: आपले परम दैवत विठ्ठल! टक लावून पहात आहेत की आमच्या तुकारामांना काय विचारतात?

संत तुकाराम : ते आम्ही काय सांगू? पण त्यांनी सांगितले आहे ते सर्वस्व येथेच आहे. (येथे तुकाराम महाराजांनी गुह्य उघड केले आहे.)

सद्गुरु बाबा : त्यांनी सांगितले की येथेच पकडा.

संत तुकाराम : ते काही असो. आम्ही सताचे सेवेकरी. जसे सांगितले तसे आम्ही वागू सता ! हे कोणते युग चालू आहे?

सद्गुरु बाबा : हे कलियुग चालू आहे.

संत तुकाराम : आपणास कल्पना आहे, आम्ही सेवेकरी काय सांगू शकणार? एकच सांगावेसे वाटते, योग आला म्हणून. या कलियुगातील मानव आहेत. त्यांना कशाची भक्ती करावीशी वाटते सता ! आपल्या सानिध्यात असणाऱ्या म्हणजे सत सेवेकरी! सत सेवेकर्‍यांनी कशाची उपासना करावी? तर केवळ सताची! परंतु सत पहावयाचे असेल तर वागणे कसे पाहिजे, बोलणे, राहणे कसे पाहिजे? तर सत शुद्ध! मग सेवेकरी सतापासून दूर का आहे?

सता आपणास कल्पना आहे, तरी थोडेसे सांगतो, ज्यावेळी कर्तव्यासाठी आम्ही येथे आलो, त्यावेळी अघोर मानवांनी किती त्रास दिला? परंतु सता आम्ही त्यांना वेडेवाकडे बोललो का? त्याचप्रमाणे या कलियुगातील मानव वागू लागले तर? ते सता पासून दूर राहतील का?

तुकाराम महाराज म्हणतात, “एकच, आपल्या दर्शनाची इच्छा आहे.” ©️

You cannot copy content of this page