श्री क्षिराब्धी – संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडे ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांनी आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही. आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी विचार करून कार्य करावे लागते. ते करताना सत् कुठे आहे, असत कुठे आहे, कोणत्या बाजूने कार्य करावयाचे त्याचा पूर्णत्व विचार करून कार्य करावे लागते. करायचे आहे. कलियुगातील स्थूलांगी मानवाचेच शुद्धीकरण नव्हे तर, सूक्ष्म, कारण, महाकारण, अणु, रेणू, परमाणु, यांचे हे शुद्धीकरण चालू आहे. अन् आता स्थूल मानवाचे शुद्धीकरण आहे. त्यात चौथ्या टप्प्याचा शेष भागाचे शुद्धीकरण होणार आहे. शुद्धीकरण एका क्षणातही करता येते, पण तसे करावयाचे नाही. कर्तव्य करीत असताना आपले परके पहावयाचे नसते. आपले आहे त्याला विरोध कसा करू ही शंका आणावयाची नाही. पूर्वी जे ऋषीमुनी होते, त्यांचे आश्रम मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना सुद्धा त्रास होत होता. राक्षस त्यांना सतावित होते. पण हा एका तऱ्हेने कस पहावयाचा असतो. तसा हा कस आहे. महान कोट्यावधी वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी असले तरीसुद्धा त्यांचे हाल झाले हे का? सत पदाचा सेवेकरी कर्तव्य करावयाचे झाले तर त्याला कसाला उचलून घ्यावेच लागते. आपणास माहित आहे, सत कर्तव्य होते तो पर्यंतच जवळ घेतले, सत कर्तव्य संपल्यानंतर त्याला दूर फेकण्यात आले. पण जे पूर्णांगी सत आहे त्यांना जवळ करणार, जवळ केले आहे. आपले सेवेकरी मानवी तऱ्हेचे आहेत. त्यांना सद्गुरुं बद्दल किती आपुलकी आहे, हे पाहण्यासाठी हे सर्वस्व करावे लागते. आपणाला कोकणात त्रास झाला हे मला माहित आहे. पण आता सर्वस्व बरोबर होणार आहे. ©️
हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही. गुरुपद म्हणजे आकार आला, मानवाला त्याची सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला …
