श्री समर्थ मालिक – मी एकदाच प्रणव दिलेला आहे. ते प्रणव खोटे होऊ देणार नाही. हे सत्य आहे. कर्तव्यात सेवेकर्यांनी पाठीपुढे व्हावयाचे नाही. बाकीचे काही बोलता येत नाही. ते कसे करावयाचे ते माझे मी जाणतो. वेळ जवळ जवळ येत चालली आहे. सेवेकर्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. नाही पेक्षा सेवेकरी माझ्या दृष्टी आड येतात. नजरेसमोर येतात. त्यांचा दृष्टिकोन असा नाही. त्यांच्यावर माझी नजर आहे. तरी जी घडण घडवायची ती घडवून घेणार आहे. सेवेकर्यांनी घाबरावयाचे नाही. ती वेळ आत्ता आलेली आहे, पण अमुक वेळेला होणार हे सांगणार नाही. पण होणार. वेळ नजीक आलेली आहे.
या तीन आराखड्यातून कर्तव्य राहील असे मला वाटत नाही. पूर्ण अघोर उपटून काढण्याचा प्रयत्न आहे. अघोर उपटून काढल्याशिवाय शापदग्ध भूमी पवित्र होणार नाही. अग्निचा कल्लोळ, ज्या वेळेला पर्वतात वनवा लागतो, तो विझविल्याशिवाय शांती नाही. तो विझविण्यासाठी महान कृती करावी लागते. त्याशिवाय तो शांत होणार नाही. तो फार वर्षापासून सारखा धूमसत आहे. त्याची पूर्तता करणे माझे कर्तव्य आहे. या महान अग्निच्या तोंडाला कोणाला द्यावयाचे हे मलाच माहित आहे.
हि तीन संक्रमणे आहेत. एकातून जरी वाचला तरी दुसरे, दुसऱ्यातून जरी वाचला तरी तिसऱ्यात सोडणार नाही. हे ठाम आहे. मग तुम्ही काही करा. हे कर्तव्य घडल्या शिवाय राहणार नाही. तप:श्चर्या करा अथवा झाडाला उलटे टांगून घ्या, अथवा काही करा, पण सोडणार नाही. आपणाला आज संदेश द्यावेसे वाटतात, आपण जरी तप्त असलात तरी वरून दाखवायचे नाही. सर्व लोक सारखे आहेत असे काही नाही. मानव आहे म्हणून आपला तप्तपणा कोणाच्या नजरेस येणार नाही असे करा. (समाप्त) ©️
