Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

श्री समर्थ मालिक प्रवचन (१) ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन (१) ©️

मानवाने सदिच्छा, सत् भावना, सत् संग या योगानें आपले कार्य भूतलावर करीत राहावे. सत् शिष्य सद्गुरूला तन, मन, धन अर्पण करून शरण जातो आणि अमूल्य असा ठेवा त्याजजवळ शिल्लक राहतो. हा अमूल्य ठेवा म्हणजेच सद्गुरु ठेवा होय.

सत् शिष्य हा सद्गुरुंचा दास, सद्गुरु सत् शिष्यांचे दास. असे हे वलय एकमेकां भोवती गुरफटलेले आहे. आपल्या मनाची, मायावी बंधनाची जाळी तोडून सद्गुरुंचा शोध घेण्यासाठी जावयाचे आहे. हा शोध घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यांची जाण घेण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता नाही. या योगे त्यांची ओळख होणे शक्य नाही.

रिद्धी सिद्धी, तंत्र मंत्र ह्या परिभ्रमणाच्या पायऱ्या आहेत. ह्या सद्गुरु शोधण्याच्या पायऱ्या नव्हेत. सद्गुरु शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सद्गुरु चरणांवर तन, मन, धन अर्पण करणे. सत् विवेक, सत् संग, सत् आचार, सद्बुद्धी, अत्यंत लीनता, अत्यंत नम्रता, सत् भक्ती, सत् मार्ग यांची कास धरणे !

मी कोण? याची जाण घेणे, त्याची ओळख करून घेणे. जी सर्वस्वाची घडण होते, ती कोणाच्या सत्तेने होते? याचा ठाम विचार करणे. या सर्वांची ज्याने ओळख करून घेतली, त्याच्या पासून सद्गुरु दुर नाहीत. अशा तऱ्हेने ओळख करून घेण्यासाठी, सद्गुरु चरणांच्या दर्शनासाठी आतुर होवून आपले कर्तव्य कर्म करीत राहणे हेच सर्व श्रेष्ठ कर्तव्य आहे. ©️

You cannot copy content of this page