Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

       सेवेकरी ऐकत नाहीत, म्हणून असे सांगावे लागते. दोन्ही सारखीच आहेत. असे सांगण्याचे कारण, या भीतीने तरी, त्यांनी चांगले वागावे. ज्यावेळी आपण सातारला गेला होता, त्याप्रमाणे स्थिती ठेवणे. 

       दरबारची वेळ ४ ते ८ दरम्यान राहिल. त्यावेळेला याच ठिकाणी ते खडे राहतील. नियमाप्रमाणे वागा व कृती करा. याने मालकांना आनंद होईल. आनंदाच्या भरात आदेश सुटतील. इच्छेप्रमाणे प्रवचन होईल. शंका विचाराव्यात. भक्ती वर विचारल्यावर सांगतील. 

       आपली वळणे चांगली ठेवा. चुकांची नोंद होईल. सेवेकरी म्हणतील, आसनावर कोणी नाही. कसे ही वागा. पण आसनावर कोण आहेत? याची जाणीव ठेवून वागा. 

       आरती घेण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. प्रत्येकाचे मन शुद्ध पाहिजे. गढूळ नको. प्रवचनावर विचार करा. शंका विचारा. मात्र ऐकून सोडून देऊ नका. आपले सेवेकरी म्हणतात, “बाबा याठिकाणी नाहीत.” पण बाबा कोणत्या स्वरूपात आहेत, याची जाणीव घ्या. ते रुप पाहाण्याचा प्रयत्न करा व त्याप्रमाणें वागा. सद्गुरु व तुम्ही एकच आहात. पण ते कसे दडलेले आहेत, याची जाणीव घेण्यासाठी प्रयत्न करा. मानव म्हणजे ईश्वर आणि तो अशा तऱ्हेने नटलेला आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page