Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

श्री विठ्ठल ……. प्रवचन ©️

श्री विठ्ठल ……. प्रवचन ©️

विठ्ठल – भक्तीचे मुळ म्हणजे काय? व कसे? 

             प्रथम कोणतीतरी एक वस्तू आपण नजरेसमोर आणतो आणि ती वस्तू सत् कृतीने पुजतो. त्या वस्तूवर भावना असावी लागते. आता ह्या सत् कृतीची जाणीव कशापासून होईल? तर एकच ! प्रथम सद्गुरुना शरण जायला हवे. मग ती वस्तू सर्व जगात सर्व ठिकाणी वावरते याची परिपूर्ण जाणीव होईल. 

       आता ती जाणीव कोणत्या स्वरूपाची? कोणत्या तऱ्हेने होईल? ज्या ठिकाणी आपण शरण जाणार, त्या ठिकाणी पूर्णत्व लीन व्हावयास हवे. त्या माऊलीच्या चरणात लीन झाल्यावर ती माऊली आपोआप मार्गदर्शक होते. ती मार्गदर्शक झाल्यावर त्या मार्गाने जाणे प्रत्येकाचे कर्तव्य होय. 

       आता तो मार्ग कोणता?

       माऊलीस शरण गेल्यावर स्वयंप्रकाशाची जाणीव मिळतें. त्या प्रकाशाच्या अनुसंधनाने प्रत्येक ठिकाणची जाणीव मिळते आणि त्या रस्त्याने जर सेवेकऱ्याने मार्गक्रमणा केली तर उत्तमच ! मनाच्या आधीन होऊन जर तो चालु लागला तर घसरलाच म्हणून समजा ! जर सेवेकरी माऊलीच्या चरणात लीन झाला, तादाम्य पावला तर त्या सेवेकऱ्याला सोडून माऊली दूर आहे का? तर नाही. मात्र अशा पात्रतेचा तो सेवेकरी व्हायला हवा. जो होईल, त्यालाच प्रत्यक्ष दिसेल. प्रत्यक्ष अनुभव येईल अन्यथा नाही. नुसते मी सेवा करतो म्हणून जमत नाही. जमणार नाही. अशाने ते साध्य होणे शक्य नाही. 

       भक्ती म्हणून म्हणाल, तर ती जेवढी सोपी व सरळ तेव्हढीच ती कठीण व अवघड आहे. करील त्याला सोपी आणि ज्याची इच्छा करण्याची नाही, त्याला अत्यंत दुर्लभ होय. जो कृतीला निघाला, कर्तव्य तत्पर झाला, त्याला कठीण नाही. ज्याला कृती करण्याची इच्छाच होत नाही, त्याला पर्वतापेक्षाही जड व कठीण दिसते. यापेक्षा आणखी वेगळे काय सांगू? ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page