Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

श्री गुरु पौर्णिमा-अलक©️

श्री गुरु पौर्णिमा-अलक©️

श्री अलक एकचित्त – सेवेकरी अन् सद्गुरु हे नाते निराळे आहे. सेवेकरी वेगळा नाही. म्हणून सेवेकऱ्यांनो, बंधुभाव, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश ध्यानी बाळगून आचरणात आणणे, ठेवणे. समता म्हणजे सेवेकरी सद्गुरु तादात्म्य होणे. ही समता सेवेकऱ्यात पाहिजे, बंधुभाव पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष असता कामा नये. एक सेवेकरी एक सद्गुरु एवढे तादात्म्य व्हावयास पाहिजे.

आजची ही सेवा तन-मन-धनाने, स्वयं भावनेने अर्पण करावयाची हाच गुरुकुलाचा महिमा आहे. सेवेकऱ्यांची पूजा म्हणजेच सद्गुरूंची पूजा! सद्गुरु निराळे नाहीत. ते तादात्म्य झालेले असतात. ते कधीही कोणाला सुटणार नाही. जी ज्ञानरूपी गंगा पाजली तिचे थोडे तरी चीज व्हावे. त्याचे श्रेष्ठत्व म्हणून व्यासपूजा. यावेळी सद्गुरु अन सेवेकरी एकमय होतात. सेवेकऱ्याप्रमाणे सद्गुरु ही तादात्म्य होतात. गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देतो, एकरूप होतो. त्याची आठवण करून देणे. हाच गुरुपौर्णिमेचा महिमा आहे. या शुभ दिनापासून बंधूमय भावनेने, प्रेममय भावनेने वागणे हेच शुभ दिनी संदेश देत आहे.©️

You cannot copy content of this page