Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

“विषय तो माझा झाला नारायण” ©️

“विषय तो माझा झाला नारायण” ©️

“विषय तो माझा झाला नारायण”

विषय हे पाच आहेत – बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध ! बोल या विषयामध्ये हरण हा मृत्यू पावला आहे. स्पर्श या विषयामध्ये हत्ती मृत्यू पावला आहे. रूप या विषयांमध्ये पतंग मृत्यू पावला आहे. रस या विषयांमध्ये मासा मृत्यू पावला आहे आणि गंध या विषयांमध्ये भ्रमर मृत्यू पावला आहे.

प्रत्येक ज्योतीच्या पाठीमागे हे पाचही विषय आहेत. या पाचही विषयांवर जो स्वार झाला, त्याची गती काय होत असेल? म्हणून मानवाला शांती, सुख, समाधान यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. या विषयांवर स्वार झाल्यामुळे अशी अवहेलना होते. तरी अवहेलना न होता शांती, सुख, समाधान लाभेल अशा तऱ्हेने वाटचाल करावयास पाहिजे. या विषयापासून अलिप्त राहावयास पाहिजे.

पण हे इतर मानवांसाठी आहे. येथील सेवेकऱ्यांसाठी नाही. विषयाचा त्याग करून, आसनाधिस्तानी दिलेल्या मार्गावरुन वाटचाल केल्यानंतर कसलीही अडचण भासणार नाही. संकटे येणार नाहीत. येऊ देणार नाहीत.

पण या तत्त्वांचे आकलन करून वाटचाल करील तर या चौकटीत तो बसेल. मग तो वरील बाबतीत बोलू शकतो. त्याला जिकडे तिकडे सतच दिसते. सांगितल्याप्रमाणे वाटचाल करून, मनन करून सद्गुरु सानिध्यात वाटचाल करणे. अशी वाटचाल करीत मग वरील वाक्य शोभते. नाहीतर “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात”.

पण येथील स्थिती जी आहे, ती म्हणजे, येथे प्रत्यक्ष कृती केली जाते आणि नंतर सांगितले जाते. दुसरीकडे अशी स्थिती नसते. येथे खूप असले तरी सांगणे मर्यादित असते. सेवेकऱ्यांनी विषयांपासून अलिप्त राहावे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page