श्री समर्थ मालिक – विषय एकच आहे. भक्ताने आपले कर्तव्य करणे. विषय नेहमीच आहे. पण ज्ञान? ज्ञानापासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत.
एकच विषय – अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात सेवेकर्यांनी कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे. याच अखंड विषयावर लक्ष देणे, म्हणजे सेवेकरी बाहेरच्या वा कुठल्याही विषयाची त्याला आवश्यकता नाही.
मन हे चंचल आहे. मग भक्त कसा पाहिजे? भक्त अशा चंचल गतीचा असला तर त्याला सेवेकरी म्हणता येईल काय? जो भक्त अहर्निश सत् सानिध्यात, कर्तव्यात, अखंड नामात आहे, त्याच्यासाठी सर्व आहे. असा भक्त कोण आहे का?
अखंड नाम मिळाले म्हणून भक्त होत नाही, तर कृती तशी पाहिजे. मी सेवेकरी आहे, मला अनुग्रह झाला, पण हे म्हणण्यापुरते आहे. निदान असे म्हणू तरी नका, तर कर्तव्य करा. येथे कर्तव्यें दिलेली आहेत.
या तत्त्वाची जो जो सेवेकरी देखभाल करील, तोच तो सेवेकरी होय ! आपला सेवेकरी तंत्र, मंत्र, जंत्र करणारा आहे काय? काही सेवेकऱ्यांनी तत्व नेलेले आहे. तत्व आसनावरुन मोलाचे बोल सांगत असते, ते कोणी घेतले आहे का? आसनावर तत्व आहे, मालिक आहेत. मग मानव म्हणतो, समर्थांच्या कृपेने बरे झाले तर……….
माझ्या घरात तत्व असल्यानंतर कोणीही माझे काहीही करू शकत नाही. हाच विषय गहन आहे. मग या विषयापेक्षा विषय कुठला, याच विषयावर सेवेकऱ्यांना संदेश देत आहे. आपआपल्या कर्तव्यात राहा. (समाप्त) ©️
