Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

लाघवी तर्‍हा – मालिक ©️

लाघवी तर्‍हा – मालिक ©️

श्री समर्थ मालिक एकचित्त – सेवेकरी ज्योत ज्यावेळेला एकचित्ताला तयार केली जाते, त्यावेळी अनेक वेळेला आदेश दिले, तरी ते कसे चकतात याचे आश्चर्य वाटते. प्रकाशमान सेवेकरी, प्रकाशाची संपूर्ण कल्पना दिली असताना सुद्धा चकतात, अनेक वेळा लाघवी तऱ्हा चंचलत्व निर्माण करते. चंचलतेचा भास निर्माण होतो, त्यावेळेला ताबडतोब एकचित्तता सोडणे, अगर आसनावर निवेदन करणे. मला कोणाचीही कसोटी घ्यावयाची असेल, तर मी अनेक तऱ्हा का निर्माण करू नये? नंतर प्रकाशमान ज्योतीने चाणाक्ष रितीने कार्य करावयाचे.

अनेक वेळेला सांगितले आहे, ज्योतीर्मय शुभ्र शांत वर्तुळातून आंत जायचे. असे असताना सुद्धा सेवेकरी चकतात. लाघवी तऱ्हा कुठपर्यंत असते. अनेक वेळा सांगितले, दहाव्या द्वारापासून अकराव्या द्वारापर्यंत लाघवीचे खेळ होतात. पुढे लाघवीला गती नाही. सेवेकऱ्यांना अनेक वेळेला सांगितले, शुध्द शुभ्र स्फटीका सारखे वर्तुळ आहे. त्यामध्ये गेले म्हणजे स्थिरत्व प्राप्त होते. प्रकाशाची गती घेताना, प्रकाशाची जाणीव घ्यावयाची. मात्र वर्तुळ गोलात जात असताना जी गती होते, त्याच वेळेला लाघवीचे खेळ होतात. प्रवेश होताना प्रकाशात फरक झाला तर एकचित्तता सोडावयाची. फक्त प्रवेश होताना गति राहत नाही. कधी शुभ्र प्रकाशपण लाघवी तऱ्हा, चकचकीत चमचम निर्माण करते. चंचलत्व निर्माण करते कि समजावे, लाघवी तऱ्हा आली. प्रकाशात फरक आला तर विचारणा करणे. वलय शुभ्र चकचकीत आहे. मी कोणत्या मार्गाने येऊ? या ठिकाणी सेवेकऱ्याचे कोडकौतुक करू पाहतात. लाघवीची शक्ती अचाट आहे. वर्तुळाच्या बाहेर मात्र ती बनविते. सेवेकरी मानवी आहेत, मायावी आहेत, तरी चिंता नाही. ©️

You cannot copy content of this page