Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मोठेपणा – कपिल मुनी©️

मोठेपणा – कपिल मुनी©️

कपिल मुनी – आपले सेवेकरी मोठे आहेत. त्यांनी लहान मुलांप्रमाणे आंतून बाहेरुन शुद्ध होणे. जे आपले बोल, ते सतच काढणे. तो बोल झेपेल तसाच काढणे. काही मानव सेवेकरी जी गोष्ट नको, त्या गोष्टींकडे वळतात. कांहीना अन्न वस्त्र सुद्धा मिळत नाही. जे या बाबतीत श्रीमंत आहेत, ते अशा माणसांकडे लक्ष देत नाहीत. ते आपल्याच मायावी मी पणात दंग असतात. त्यांनी गरीबांकडे लक्ष द्यावयास पाहिजे. ते देत नाहीत. आपल्याच मोठेपणात दंग असतात. आपणाला मोठेपणा काय करायचा? एकच, सद्गुरु ध्यानात, अखंड नामात दंग असणे. हाच मोठेपणा. हेच कपडे. हेच दागिने. अशा या परमानंदात न्हाऊन निघावयास पाहिजे. याच्या पलीकडे आनंद कोणता? सेवेकरी भलत्याच गोष्टीला भुलतात. त्या गोष्टींपासून आनंद होतो, तो नको आहे.

मायावी आनंद कोठपर्यंत? हा जो परमोच्च आनंद आहे, त्याचे खंडण कधी होईल कां? तोच शेवटपर्यंत टिकेल. त्याप्रमाणे वागा. वाटचाल करा. सद्गुरू सांगतात, त्या तऱ्हेने वागा. त्यांच्या पुढे लोटांगण घाला, तरी आनंद आहे. आपला सेवेकरी वाममार्गी जाऊ नये, तो अन्य योनीत भटकावा अशी त्यांची इच्छा नसते. ते कष्ट घेतात. तरी सुद्धा त्याला ते कष्ट म्हणत नाहीत. आनंदाने सेवेकऱ्यांशी वागतात. आनंदाने सेवेकऱ्यांसाठी सर्वस्व करतात. आपणाला एकच हवे आहे. आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय. ©️

You cannot copy content of this page