Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मायेला बगल द्या – ©️

मायेला बगल द्या – ©️

तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला, तरी त्याने आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरविली काय? तो आपल्या नादातच होता. कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का?

मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी आहे, त्यालाच हे कळेल. ती ज्योत त्या पात्रतेची होती. आपण त्या पात्रतेचा बनण्याचा प्रयत्न करा. पण हे एकदाच होत नसते. बहुत सुकृतांची जोडी ! बहुत जन्मींचे सत् संचित साठल्यानंतर एवढी पात्रता निर्माण होते.

एवढेच की, त्या तुकोबाला किती वेळा जन्म घ्यावा लागला असेल, किती वेळा मानवात पाठवावे लागले असेल, तेव्हाच ती ज्योत शुद्ध स्फटिका सारखी झाली. आता ती ज्योत कोठे आहे? समर्थ केव्हा आपणात सामावून घेतात? समर्थमय बनेल व त्याचे कर्तव्य संपेल तेव्हाच ते त्या ज्योतीला सामावून घेतात. समर्थ त्यांचे कर्तव्य बघत असतात. जराही काळा डाग दिसणार नाही अशी पात्रता येईल तेव्हाच ते त्याला आपणात सामावून घेतात. तेव्हा सेवेकऱ्यांनी मायेला बगल देण्याचा प्रयत्न करावा. तदनंतर सर्वस्व होईल. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page