Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? – श्री विठ्ठल –©️

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? – श्री विठ्ठल –©️

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? पूर्व जन्मीच्या संचिताप्रमाणे, परमेश्वराला पाहण्याची मानवाला इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होते. नंतर त्याला सानिध्यात घेतात व भक्तीचे द्वार दाखवितात.

भक्तीचे मूळ दोन अक्षरात आहे. त्यातच त्रिभुवन सामावलेले आहे. सताशिवाय त्याचे स्पष्टीकरण कोणी करणार नाही. त्याचा उहापोह समजणे कठीण आहे. अशी ही गती कोणालाही नाही. जे सानिध्यात आहेत तेच रममाण होतात. इतरांना होता येणार नाही.

“भक्ती करायची म्हणून करायची, कोणी सांगितले म्हणून भक्ती मार्गाने चालू लागला, पण कष्ट नाही, काही नाही तर त्याला समर्थ भेटणे कठीण आहे. पण सताला माहित आहे कोणाला सानिध्य द्यावयाचे आणि कोणाला नाही.”

आम्हाला सुद्धा तेच आदेश आहेत. ज्याला याची ओळख त्यालाच सानिध्यात घेतात. घेतले जाते. अखंड जागृत अशी जी महान शक्ती ते सर्वस्वाची पाहणी करतात. मानवाचा उजाळा पाहतात.

मानव देऊन देऊन काय देणार आहे? मानवात काय आहे? त्या महान शक्ती पासूनच मानव निर्माण झाला. मग देऊन मानव काय देणार? मानवाला गती नाही. त्याला वाटते तो करतो, ते सर्व तो करतो. मी जर काही केले नाही, तर मला कोण आणून देणार? पण जी कर्तुम अकर्तुम शक्ती आहे तीच सर्वस्व घडवून घेते. त्याचा मानवाला अंत नाही आणि तो सद्गुरुं शिवाय कळणे फार कठीण आहे. मानव सताच्या आधीन गेला तर ईश्वर पाहता येईल. पुढे सुरु….२©️

You cannot copy content of this page