Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

भक्तीचा जिव्हाळा ©️

भक्तीचा जिव्हाळा ©️

श्री समर्थ मालिक – ज्या ठिकाणी पाण्याचा जिव्हाळा आहे, त्या ठिकाणी खोदण्याची आवश्यकता असते काय? आपोआपच पाणी दिसते. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला आहे, त्यालाही भगवंत आपोआप दिसू लागतो. पण जिव्हाळा मागून मिळत नसतो किंवा तो मागितला तरी मिळणार नाही, तर तो कर्मसंचिताप्रमाणे मिळतो.

ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, तोच दैवाचा पुतळा आहे. ते बोल कोणी फेकले? ते बोल चुकीचे आहेत का? ज्याने हा भक्तीचा जिव्हाळा जाणला त्याला कुठेही जाण्याची, भटकण्याची आवश्यकता नाही. मग तो जंगलात, अरण्यात बसतो कां? ज्यांना साधन साधावयाचे, नाव कमवायचे ते जंगलात, गुहेत जाऊन बसतात. केवळ साधन साधण्यासाठी ते जात असतात.

परमेश्वर पाहण्यासाठी ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्राची आवश्यकता नाही. ज्याने वेदांचा मुख्य पिताच हाताशी धरला,‌ त्याला इतरांची आवश्यकता काय? म्हणून ज्यांना मी सापडलो, ज्यांनी ओळख करून घेतली, त्यालाच हे वर्म समजले आहे. ज्याला प्रणवाची गोडी आहे, तो कान भरून ऐकू शकतो. तोच मानव सत् मार्गाने, सत् भक्तीने जाण्याचा प्रयत्न करतो. इतरांना गोडी नसते.

अनेक तऱ्हेने अनेक रूपाने ही प्रकृती नटलेली आहे. अनंत तऱ्हेचे मानव अनंत चवीने नटलेले आहेत. तेथे सताचा काय दोष आहे? हा सर्व मायेचा बाजार आहे. हे मायेचे कर्तव्य आहे. मला जर काही करावयाचे असेल तर लाघव तऱ्हेने सूत्र फिरवित असतो, पण सद्गुरूंचे आपल्या सेवेकऱ्याकडे लक्ष असतेच ! (समाप्त)

You cannot copy content of this page