Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

पळवाट काढू नका…©️

पळवाट काढू नका…©️

सर्व ठिकाणी व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे ज्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी कसा असेल? माझ्याशी कोण बोलतो त्याची तो विवंचना करील. जडत्व मानव बोलतो आहे का? कोण बोलतो आहे? सर्व व्यापक, सर्व भूतेषु मी आहे हे जर जाणले, तर त्या पात्रतेची उत्तरे तो देऊ शकतो.

मातीचे ढेकुळ पाण्यात विरघळते, त्याप्रमाणे सेवेकरी पाण्यासारखा कधी होईल? याची अपेक्षा करावी का? असा आदर्श सेवेकरी बनला, मग मात्र जो बीजदाता निर्माण करणारा, बीजात बीज उत्पन्न करणारा कोण त्याचा शोध घेईल. असा जर बीज निर्माण करणाऱ्याचा पाठलाग केला, तर तो सापडेल. पण कसा सापडेल? माझे तुझे केल्यावर सापडेल का? सेवेकर्‍यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे, याची खूणगाठ बांधावी, तरच बीजदाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती, तर तो या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली, तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव असून, ओळख असून, पळवाट काढली तर दोष कोणाचा? म्हणून पळवाट काढू नका.©️

You cannot copy content of this page