Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल…©️

नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल…©️

श्री समर्थ मालिक – विठ्ठल विठ्ठल गजरी |

अखंड तत्व (म्हणजे त्या सताचे नाम) सत् पदाच्या आसनावरून आपल्या सद्गुरुंनी आपल्याला बहाल केलेले आहे. सत मुखातील वाणी म्हणे, विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी ||

नामाचा गजर कोठे होतो अन् त्या नामाची पंढरी कशी आहे, कोठे आहे, कशी दुमदुमून गेली होती, कशी दंग झालेली होती विठ्ठल नामात? मग त्याचप्रमाणे सेवेकरी त्या नामाने, विठ्ठल नामाने दुमदुमला जाईल, तर त्या नामाने दुमदुमलेली पंढरी शुद्ध असेल की अशुद्ध असेल? शुद्ध असेल. मग त्याप्रमाणे आपल्या दरबारातील सेवेकरी त्या नामाने दुमदुमलेले आहेत का? त्या विठ्ठल नामाने जर सेवेकर्‍यांनी पंढरपुरी दुमदुमून गेलेली आहे, तर आणखी इतर व्याप आणि इतर तऱ्हा का लागू पडतील? हे योग्य आहे काय कि अयोग्य आहे? सेवेकर्‍यांनी हे लक्षात ठेवावे की याच्यातच मर्म आहे. ते आकळले पाहिजे.

प्रकृती म्हणजे ती पंढरी आहे. विठ्ठल नामाने ती दुमदुमून गेली पाहिजे. मग त्या मायेला बंधन घालून दुमदुमलेले पडसाद पडले मग इतर निसर्गाचे लाघव होतील काय? अखंड तत्व तुमच्यापासून दूर होईल काय? मग सेवेकर्‍यांनी खरोखरच काय करावयास पाहिजे? तर नाममय झाले पाहिजे. मग आपणांस सद्गुरु दर्शन दूर नाही. पण इतकेच, आपले सेवेकरी तितके तन्मय होत नाहीत. सेवेकरी अशा दुमदुमल्या पंढरीमध्ये, त्या नादात तल्लीन झाला आहे काय? गुंग झालेला आहे काय?

मी सांगतो ते आपल्याला टोचक शब्द आहेत. आपण त्यातच लयबद्ध व्हा. प्रकृती अभिन्न झाल्यावर, मग तुम्ही आणि मी एकच ! एवढे होण्यासाठी पुष्कळ सेवेकरी आनंदी वातावरणात असावेत. कोणीही कोणाला वाईट इच्छेने वागवू नये. सेवेकर्‍यांनी सेवेकर्‍याला वाईट भावनेने पाहू नये अन् अमृता पेक्षाही गोड प्रेमाने वागावे असे संदेश आहेत. सख्खे भाऊ, केव्हा ना केव्हा, कधीतरी वाटा मागणारच, पण हे गुरुबंधूंचे नाते आहे. तो केव्हाही वाटा मागणार नाही. तो उपयोगी पडेल. त्याप्रमाणे सेवेकर्‍यांनी वागावे अन् हसत खेळत काळ घालवला पाहिजे. पण हा काळ अगदी नजीक येत आहे. एकमेकांचे प्रेम, अखंड झरा हृदयामध्ये कसा पाझरेल ते लक्षात ठेवा. म्हणजे सांगितल्याप्रमाणे विठ्ठल नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल ते केल्यानंतर समजेल. तोपर्यंत नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page