Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामाचा महिमा-२-©️

नामाचा महिमा-२-©️

तुकाराम महाराज – “ब्रह्मानंदी लागली टाळी। कोण देहाते सांभाळी ।।’’ ही टाळी लागल्यानंतर नारायणाला शोधण्यास कोठेही जावे लागत नाही. स्वर्गात, मृत्यूलोकात कोठेही जावे लागत नाही, तर त्याचे अस्तित्व सतशुद्ध (चरणातच) अंत:करणात असते. त्याला शोधण्यासाठी सतशुद्ध आचरण ठेवले पाहिजे, मग अनंत लांब नाहीत. त्याचे साधन एकच हे नाम आहे. सतशुद्ध सात्विक आचरण आहे. अशा तऱ्हेने नाम घेतो, त्याच्यासाठी नाम आहे. ते सद्गुरु मुखातूनच मिळावयास पाहिजे. ज्याला ते मिळाले तो पांडुरंगमयच होतो. ज्याचे मन पांडुरंगमय झाले, त्याच्याच शोधात पांडुरंग असतात. बसल्या ठिकाणी गती देऊन विलीन करून घेतात.

विचलित झालेली मानवांची मने स्थिर करण्यासाठी, मी किर्तन करीत होतो. यासाठीच मला पाठविले होते. श्रवण, मनन, कीर्तन ही प्रथम पायरी आहे. या ठिकाणची (दरबारची) गती ही पुढची पायरी आहे.

कीर्तन ही प्रथम पायरी आहे. अभंगातून नामाचा महिमा अगाध आहे हेच सांगितले आहे. सत शुद्ध अंतःकरणाने विधीयुक्त रितीने साठा केला तर अनंत लांब नाहीत. तो भक्त त्यांना शोधीत नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंग भक्ताला शोधत येतात, असे ते एकच बीज आहे. ते सर्वत्र विखुरले आहे. असा नामाचा महिमा आहे. भक्तीचे साधन नाम आहे. भक्ती कठीण नाही. एकच, एकाग्र चित्ताने चिंतनमय होऊन, नाममय होणे, मग अनंत दूर नाहीत. या ठिकाणी जे सत भक्त आहेत, ज्यांना सत सानिध्य प्राप्त झाले आहे, या ठिकाणी अखंड नामाचा प्रवाह आहे. ज्यांना हे नाम मिळाले ते सतगतीत गेल्याशिवाय कधीही राहणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page