Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

मालिक एकचित्त – नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! काही एक नव्हते, असे काही मानवांचे म्हणणे आहे. पाचही तत्वे नव्हती, मग यांचा कर्ता कोठे होता? ते ब्रह्म कोठे राहिले होते? मी मागेच सांगितले आहे. मला कर्ता करविता कोणीही नाही. मी अखंड आहे. मला नाही आई बाप. मी स्वयमेव आहे. याची गती मानवाला नाही.

पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना झाल्यानंतर, मानवांची उत्पत्ती केली. प्रकृतीच्या अनुसंधनाने मानवा मानवात वितंडवाद निर्माण होतो. पण, सत् कोठे आहे? कसे आहे? कोणीही पाहिलेले नाही. मी सर्वभूतेषु पश्य आहे. ही गती त्यांना नाही. पण अमुकच हे आहे असे कोणी दाखविलेले नाही. म्हणून प्रकृतीचा भांड निर्माण होतो. त्यामुळे भेदाभेद निर्माण झाले. जो तो आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. आपले सर्वस्व स्थापण्याचा प्रयत्न करतात. मानव मनाच्या आधीन गेला तर मन बुध्दीच्या चाकोरीने जाते. मी जर अभिन्न आहे, तर मानवाने माझी ओळख का करून घेऊ नये? मी अभिन्न आहे, हे जर कळले असले, तर तो फसणार नाही. पण प्रकृतींच्या चाळ्यांमुळे तो फसतो.

मानवानीच जातीवर्ण निर्माण केलेत, धर्माच्या शाखा निर्माण केल्यात, हे मी सांगितले आहे. मानवाने जर सत् भक्तिची गती घेतली तर, जातीयवाद निर्माण होईल का? या चाकोरीने गेला तर त्याला सर्वस्व एकच दिसेल. सर्व संतांनी सांगितले आहे, त्यांनी गती घेतली, त्यांना एकच तत्व दिसत होते. त्यांनी सांगितले त्यात काही वावगे नाही. पण हल्लीचा मानव अहंकाराने बरबटलेला आहे. अशा मानवामुळे भक्तीचे लोण वाढत नाही. सत भक्तीने जाणारा जगात कोणी नाही, फार विरळा आहे.©️ पुढे सुरु….२

You cannot copy content of this page